Take a fresh look at your lifestyle.

स्वातंत्र्यसैनिक म्हणून माहित असलेल्या अरुणा असफ अली दिल्लीच्या पहिल्या महापौर होत्या

0

१९४२ साली देशाच्या स्वातंत्र्यासाठी अखेरचा लढा म्हणून “चले जाव” आंदोलनाला सुरुवात झाली. महात्मा गांधीजींनी राष्ट्रास “करो वा मरो” चे आव्हान केले. त्या वर्षी ८ ऑगस्ट रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंक मैदानावर भरलेल्या सभेत एका तरुण स्त्रीने कॉंग्रेसचा झेंडा झेंडा फडकवला होता. ती व्यक्ती म्हणजे अरुणा असफ अली.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभागी असलेल्या त्या १९४२ साली मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर भारतीय राष्ट्रध्वज फडकावल्याबद्दल सर्वत्र लक्षात आहेत. त्यांना ‘भारत छोडो इंडिया’ची नायिका म्हणून संबोधण्यात आले. स्वातंत्र्यानंतर त्या राजकारणात सक्रिय राहिल्या आणि दिल्लीच्या पहिल्या महापौर झाल्या.

कॉलेजमध्ये अध्यापन आणि स्वातंत्र चळवळ

अरुणा असफ अली त्यांचे मूळ नाव अरुणा गांगुली असे होते . १९०९ साली कला येथे जन्मलेल्या अरुणाजींनी लाहोर आणि नैनिताल येथून शिक्षण पूर्ण करून अध्यापनक्षेत्र निवडले आणि कोलकात्यातील गोखले मेमोरियल कॉलेजमध्ये अध्यापन सुरू केले. पण १९२८ साली स्वातंत्र्यसैनिक असफ अलीशी लग्न केल्यानंतर त्यांचे आयुष्य एका नव्या दिशेने वळले. पतीच्या खांद्याला खांदा लावून ती स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय झाली.

इंग्रजांना त्यांना पकडता आले नाही

महात्मा गांधींच्या आवाहनावर, सन 1942 मध्ये सुरू झालेल्या भारत छोडो आंदोलनादरम्यान त्यांनी उत्तम धीर, शौर्य आणि नेतृत्वची ओळख करून दिली. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी ब्रिटिशांना उघडपणे आव्हान दिले की, मुंबईच्या गवलिया टँक ग्राऊंडवर तिरंगा फडकावून देश सोडून जा. इंग्रज राजवटीने त्यांच्यावर पाच हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते . त्या आजारी असताना महात्मा गांधींनी त्यांना शरण जाण्याचा सल्ला दिला, पण तरीही १९४६ पर्यंत इंग्रजांना त्यांना पकडता आले नाही. पण अटक वॉरंट काढून घेतल्यावर त्या पुढे आल्या .

कैद्यांना केले संघटित

स्वातंत्र्य चळवळीची ती ‘द ग्रँड ओल्ड लेडी’ म्हणून प्रसिद्ध आहे. ती एक भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ती आणि स्वातंत्र्यसेनानी होती, तिने मीठ सत्याग्रह आंदोलनात तसेच इतर निषेध मोर्चातही भाग घेतला आणि तुरूंगात टाकण्यात आले. त्यांनी राजकीय कैद्यांना संघटित केले आणि उपोषण करून तुरूंगात देण्यात आलेल्या गैरवर्तनाचा निषेध केला. लिंक या नावाने प्रकाशन संस्था काढून वृत्तपत्रे, मासिके व पुस्तके प्रकाशित केली.

भारतरत्न देऊन गौरव

देश स्वतंत्र झाल्यानंतर १९५८ मध्ये ते दिल्लीच्या पहिल्या महापौर झाल्या . अरुणाजींचे जीवन साधेपणाचे उदाहरण आहे. वयाच्या आठव्या दशकातही त्यांनी सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर चालू ठेवला. राष्ट्र उभारणीत त्यांनी आयुष्यभराच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अरुणाजी यांचे 29 जुलै 1996 रोजी निधन झाले. १९९७ मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन गौरवण्यात आले.

सार्थक सावजी , मेहकर

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.