शरद पवार यांची कन्या म्हणून सुप्रिया सुळे राजकारणात आल्या. पण सक्रीय राजकारणात आल्यानंतर त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. बारामती मतदारसंघातून लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर लोकसभेतील त्या अभ्यासू खासदार म्हणून त्या ओळखल्या जातात. २०१४ मध्ये देशात भाजप सरकार आले. त्यानंतर विरोधी पक्षात काम करताना त्यांची आक्रमक भूमिकाही सगळ्यांनी पहिली. दिल्लीतील अनुभव, शरद पवारांचे एक वडील म्हणून मार्गदर्शन, सोशल मिडिया, दिल्ली आणि महाराष्ट्र, लोकसभेतल्या कामाचा अनुभव असा खुप मोठा राजकीय अनुभवांचा कॅनव्हास उलगडत जाणारी खासदार सुप्रिया सुळे यांची विशेष मुलाखत…
माझं बालपण मुंबईत गेलंय. मुंबई आणि दिल्ली ही दोन्ही कॉस्पोपॉलिटन कल्चर असणारी शहरं आहेत. मुंबई ही देशाची औद्योगिक राजधानी आहे. जनतेच्या आशिर्वादाने खासदार झाल्यानंतर मी देशाच्या राजकीय साजधानीत अर्थात दिल्लीत आले. दिल्ली हे देशाच्या राजधानीचं शहर आहे. या शहरात देशभरातील सर्व संस्कृतींचा मिलाफ झालेला आहे. दुसऱ्या शब्दांत तुम्ही दिल्लीत संपूर्ण भारताचं दर्शन घडतं असं म्हणू शकता. देश शिकायचा असेल तर दिल्ली अवगत करुन घेणं महत्त्वाचं असतं. दिल्लीत पोहोचणारा सामान्य माणूस अचानक असामान्य होऊन जातो. आपण मिडास राजाची गोष्ट ऐकलीय, त्यानुसार हे शहर ज्याला स्पर्श करतं त्याचं एका अर्थानं सोनं होऊन जातं.मराठी माणसांनी दिल्ली अवगत करायला शिकलं पाहिजं असं आदरणीय शरद पवार साहेब नेहमी सांगतात. त्यांचे शब्द लक्षात ठेवून दिल्ली अवगत करण्याचा प्रयत्न करतेय. दिल्लीनं मला आपला देश, संस्कृती, इतिहास यांची कदर करायला शिकवलं.
खरं सांगू तर साहेब आम्हाला कधीच सल्ला वगैरे देण्याच्या भानगडीत पडत नाहीत. तुमचं तुम्ही अनुभवातून शिकत जा या टाईपचा त्यांचा अप्रोच असतो. पण राजकारणात येण्यापुर्वी त्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण समजावून सांगितली होती. राजकारण केवळ निवडणूकीपुरतं आणि त्यानंतर केवळ समाजकारण करायचं असं त्यांनी सांगितलं. केवळ २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण असं आपल्या कामाचं सुत्र ठेवायचं असं त्यांनी सांगितलंय. तेच सुत्र अंगिकारणाच्या मी सदैव प्रयत्न करीत असते.
नाही, कधीच नाही. कारण काम मी माझ्या समाधानासाठी करते. शेवटी लोक चांगल वाईट बोलत राहतात. त्यामुळे ऐकायचं. चांगले असेल तर आपल्यात सुधारणा आणायचा प्रयत्न करायचा.
लोकसभेत ‘राईट टू डिस्कनेक्ट’ हे विधेयक मांडत असताना मानसिक थकव्याला सामोरे जाणाऱ्या या पिढीचा विचार माझ्यासमोर होता. माझ्या अगोदरच्या पिढीतील लोक आपल्या दैनंदिन धावपळीतून स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी छान असा वेळ काढत असतं. माझे सासरे ‘महिंद्रा अँड महिंद्रा’मध्ये होते. सकाळी नऊच्या ठोक्याला ते ऑफीसमध्ये हजर असत आणि संध्याकाळी पाच वाचता त्यांचे काम थांबत असे. तेथून आले की, ते टेनिस खेळायला जात. महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या कंपनीत उच्चपदावर ते कार्यरत होते. कंपनीशी संबंधित धोरणात्मक निर्णयांत त्यांचा सहभाग असे. अशाप्रकारचे काम करणाऱ्या व्यक्ती कामात प्रचंड गढलेल्या जरी असल्या तरी स्वतःसाठी वेळ कसा काढायचा, याचं गणित त्यांना जमलेलं होतं. त्यामुळेच ते मला कधीही डिप्रेस्ड किंवा कामाच्या ताणामुळे खुप थकलेले वगैरे वाटले नाहीत.हे जे मागच्या पिढ्यांना जमलं ते आजच्या पिढ्यांना का जमत नाही, असं कोडं मला सातत्याने पडत होतं. हेच कोडं मी या विधेयकाच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. राईट टू डिस्कनेक्ट या विधेयकाच्या माध्यमातून आपणा सर्वांना एक ‘क्वालिटी लाईफ’ लाभावं असा विचार आहे. या विधेयकात प्रामुख्याने चर्चा आहे ती, आपल्याला स्मार्टफोन असो किंवा इतर त्याप्रकारचे गॅझेट, त्यापासून डिस्कनेक्ट होण्याचा अधिकार असायला हवा याची…. यामुळे होईल काय तर, कामाचे तास कमी होतील हे जरी खरी असलं तरी अधिक सक्षमपणे काम करण्याचे तास वाढतील. या विधेयकाच्या माध्यमातून कामाचे ‘परिणामकारक तास’ कशा प्रकारे वाढविता येतील यावर प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न केला आहे.
यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आलो आहे. लोकसभेत देखील आम्ही महिला आरक्षणाचे बिल पास व्हावे यासाठी प्रयत्न करतो आहे. पण या सरकारने सत्तेत येण्या अगोदर वचन दिले होते, कि हे सत्तेत आल्यानंतर ‘महिला आरक्षण विधेयक’ आणतील. पण ते त्यांनी अजूनही आणले आहे. पण त्यांना आमचा आग्रह आहे कि त्यांनी ते बिल लवकरात लवकर आणावे म्हणजे जेणेकरून महिलांना आरक्षण मिळेल. परिणामी राजकारणात देखील महिलांचे प्रमाण वाढेल.
याबाबत प्रत्येकाचे वेगळ मत असत. मी तर निवडून जाते ते फक्त माझ्या महाराष्ट्रातील आणि मतदारसंघातील प्रश्न देशाच्या पातळीवर मांडता यावे. मग ते सत्तेत असो किंवा विरोधात. खरंतर आम्ही खासदार म्हणून यासाठीच तर निवडून जातो.
असं काही नाही. कारण प्रत्येक खासदार आपआपल्या परीने प्रयत्न करत असतो आणि दुसऱ्या खासदारांच्या बाबतीत बोलायचं झाल तर मी कोणावर टीका करणार नाही. शेवटी प्रत्येक जण आपआपल्या परीने करत असतो. मी देखील माझ्या परीने काम करतच असते.
याबाबतीत माझं म्हणणे असे आहे कि लगेच कशाला यश मिळायला पाहिजे. प्रत्येकांनी संघर्ष करत राहिला पाहिजे. पण जे काही जण सरकारच्या विरोधात महत्वाची भूमिका घेत आहेत. ते सर्वजण चांगले आहेत. आज नसेलही, पण भविष्यात ते सगळेजण देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात मोठी झालेली दिसतील. सध्या काही जणांना अपयश आले असेलही पण त्यामुळे त्याचे करिअर संपले असे मुळीच होणार नाही. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.
सार्वजनिक क्षेत्रात काम करीत असताना तुमच्यावर टिका-टिपण्णी होणारच. अर्थात यापुढे जाऊन आपण विचार करण्याची आणि काम करण्याची गरज. असते. आजकाल सोशल मिडियाचा बोलबाला आहे. या माध्यमातून लोक व्यक्त होत आहेत. अनेकदा लोक व्यक्त होताना अगदी खालच्या पातळीवर जाऊन टिका करतात. हे खरं तर खुप वेदनादायी असतं. लोकांनी मग ते कोणत्याही बाजूजे असोत टिका टिपण्णी करीत असताना पातळी सोडू नये.
आदरणीय पवार साहेबांनी आम्हा सर्वांना शिकविलेलं सुत्र मी या मुलाखतीच्या सुरुवातीसच नमूद केलं आहे. विरोधी पक्षात जरी असते तरी त्यांच्याशी मैत्री असू नये असं थोडीच असतं. वाद वैचारीक असतात, लोकशाहीत अशा मुक्त वैचारीक वादांची गरज आहे. या वादांतून नव्या विचार पुढे येतात. मतभेद असावेत पण मनभेद असू नयेत हे सुत्र महत्वाचं.
एकतर यावर मी असे म्हणेन कि अशी लॉबिं वगैरे काही नसत आणि महाराष्ट्रातील खासदार देखील राज्यातील प्रश्नासाठी, मुद्द्यासाठी एकत्र असतात. तसंही दिल्लीत कोणीच खासदार आपली लॉबी वगैरे अस काही तयार करायला जात नसतात. प्रत्येकजण काहीतरी नवीन शिकायला तिथे जातात. बाकीच्या राज्यातील खासदार तिकडे काही चांगले काम करत असतील तर ते काम आपल्या मतदारसंघात कसं करता येईल. यासाठी प्रयत्न करायचे असतात आणि शेवटी प्रयत्न तर सगळ्यांनी एकत्र मिळून करायचे असतात.
माझा लोकसभा मतदारसंघ
नक्कीच, यावर काही चांगले प्रयत्न करता येतील. आपण नुकतेच दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधले. महाराष्ट्र सदनामुळे दिल्लीत जाणाऱ्या लोकांची चांगली सोय झाली. विद्यार्थ्यांची वसतिगृहाची तशी मागणी असेल, तर आपण सगळे मिळून नक्कीच प्रयत्न करू शकतो.
यात फारस काही तथ्य नाही. दिल्लीत फक्त उत्तर प्रदेश, बिहार मधीलच नेते तयार होतात असं मला मुळीच वाटत नाही. मागच्या काही दिवसात जवाहरलाल नेहरू विद्यापीठ किंवा दिल्ली विद्यापीठ अश्या काही संस्थामधून विद्यार्थी नेते घडले. पण आपल्या कडील फार विद्यार्थी दिल्लीत शिकायला जात नाही. त्यामुळे तिथल्या चळवळीत आपल्याकडील मुले दिसत नाहीत. आपल्याकडील शिक्षण खूप चांगले आहे. त्यामुळे आपल्याकडे शिकायला तिकडची मुले येतात. आपली मुले तिकडे शिकायला जात नाहीत.
मला विचार करावा लागेल. (थोडा वेळ विचार करून) स्वतःच्या जाहिरातीचे काम चांगले केले.
ही दिवाळी आपल्या वाचकांसह सर्वांनाच सुख समाधानाचा जावो. महाराष्ट्रावरील दुष्काळ, आकर्षण आदीचे संकट दूर व्हावे. राज्यातील कृषिव्यवसाय नफ्यात यावा, जनतेला कायदा आणि सुव्यवस्था, उत्तम आरोग्य,शिक्षण आणि पायाभूत सुविधा मिळाव्या यासाठी आम्ही लढत आहोत. आम्ही सदैव आपल्यासोबत आहोत,यापुढेही राहू. युती सरकार आपल्या समस्यांबाबत उदासिन असले तरी खचून जायचं नाही कारण एक कवी म्हणतात त्याप्रमाणे –
हे असे असले तरीही,
हे असे असणार नाही
दिवस आपुला येत आहे
तो घरी बसणार नाही.
लढू आणि जिंकू देखील.
शेवटी सर्वाना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !!
सदर मुलाखत यापूर्वी पारंबी दिवाळी अंक २०१ ९ मध्ये यापूर्वी प्रकशित झालेली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…
उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…
आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…
अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…
सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…
This website uses cookies.