व्यक्तिवेध

जेव्हा काकासाहेब गाडगीळ लग्नासाठी राष्ट्रपतीच्या बँडचे आश्वासन देतात

महाराष्ट्रातून प्रत्येक पाच वर्षाला खासदार दिल्लीत निवडून जातात. आपल्या कार्य कर्तुत्वाने अनेक खासदारांनी दिल्लीत आपली प्रतिमा निर्माण केली. “दिल्लीतला महाराष्ट्र” अशा बाबतीत विचार करताना राज्यातून दिल्लीत निवडून गेलेल्या अश्याच काही खासदारांचे किस्से

लग्नासाठी राष्ट्रपतीच्या बँडचे आश्वासन देणारे काकासाहेब गाडगीळ

आपल्या देशात राजकारणी आश्वासन देण्यासाठी प्रसिद्ध आहेतच, पण कधीकधी नकळत काही गोष्टींना होकार देताच त्यातून विनोद निर्माण होत असतात. असाच एक किस्सा काकासाहेब गाडगीळ यांच्या बाबतीत देखील घडला होता.

काकासाहेब गाडगीळ केंद्रात मंत्री होते. ते मंत्री असताना घरच्या लोनवर बसत आणि आलेल्या लोकांचे प्रश्न मिटवत असत. आलेल्या प्रत्येक व्यक्तींचे प्रश्न सोडवत. सोबतच काही लोकांना आश्वासन देखील देत. असेच एकदा डॉ. पंडित नावाचे एक गृहस्त काकासाहेबांकडे आले. बोलता बोलता काकासाहेबांनी त्यांना त्यांच्या लग्नासाठी राष्ट्रपतीचा बँड मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

स्वागत समारंभाच्या दिवशी त्या गृहस्तांचा काकासाहेबांना फोन आला. ”अद्याप राष्ट्रपतीचा बँड आला नाही.तो जरा तातडीने असे पहा.” मग त्यानंतर काकासाहेबांनी आपल्या पीएला बोलावून बँडबद्दलविचारले. बोरकर नावाचे काकासाहेबांचे पीए होते. काकासाहेबांनी बँडबद्दल विचारताच बोरकर लगेच म्हणाले, “राष्ट्रपतीचा बँड हा खास सरकारी स्वागतसमारंभाच्या वेळीसच वापरला जातो. खासगी समारंभाला तो मिळू शकत नाही.”

मग मात्र काकासाहेबांन प्रश्न पडला आता काय करायचे ? त्यांनी बोरकरांना विचारले “डॉ. पंडितांना मी कबुल केलं आहे, आता काय करू शकतो ?” तसं आपल्याकडच्या सगळ्या राजकारणी नेत्याचे पीए मात्र खूप हजरजबाबी आणि हुशार असतात. बोरकर पण त्यातलेच. बोरकर लगेच बोलले “आपण पोलीस बँड पाठवून देवू” आणि काकासाहेब निवांत झाले. त्यांनी लगेच पोलीस बँडची व्यवस्था करायला सांगितली असे होते काकासाहेब.

काकासाहेब पुण्यातून खासदार म्हणून निवडून आले होते. १९४७च्या स्वातंत्र्याच्या नंतरच्या पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात मंत्री देखील राहिले. त्याकाळी दिल्लीच्या वर्तुळात मराठी माणसांचे काकासाहेब महत्वाचे आधार होते.

Pravin Kale

प्रविण काळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील असून सध्या दिल्ली येथे राहतात. त्यांनी पुणे विद्यापीठातून मी वाणिज्य शाखेची पदवी घेतली असून त्यांनतर दिल्ली येथून भारतीय जन संचार संस्थान दिल्ली (IIMC) येथून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

10 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.