आजच्या घडीला पंतप्रधान किंवा त्यांचे मंत्री यांच्यासोबत सुरक्षा रक्षकांचे मोठे कवच असते. पण पूर्वीच्या काळी एवढी सुरक्षा नसायची. पंडित नेहरू पंतप्रधान असतानाही सुरक्षा कवच सोबत घेवून फिरायचे नाहीत.
किस्सा स्वातंत्र्यानंतरचा आहे. पंतप्रधान नेहरू आपल्या गाडीतून संसद भवनात पोहचले. नेहरू गाडीतून बाहेर येताच, एका महिलेने नेहरूंची कॉलर पकडली
आणि म्हणाली, “भारत स्वतंत्र झाला, तू देशाचा पंतप्रधान झाला, पण मला म्हातारीला काय मिळालं ?”
यावर नेहरूंचे उत्तर होते, “तुम्ही आता देशाच्या पंतप्रधानाची कॉलर पकडून उभे आहात. तुम्हाला हे मिळालं”
असं सांगितले जाते कि खर तर त्या वेळी ती महिला राम मनोहर लोहियांच्या सांगण्यावरून नेहरूंकडे गेली होती. पण पंतप्रधान नेहरूंच्या आयुष्यातील असे अनेक घटना आहेत, ज्याच्या मधून लोकशाहीवरील त्यांच्या विश्वासाला उजाळा देतात.
देशात स्वातंत्र्य चळवळ जोरात चालू होती. कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून नेहरू तिसऱ्यांदा निवडले गेले होते आणि देशात त्यांची लोकप्रियता सातत्याने वाढत होती.
याच काळात कोलकाता येथून प्रकाशित होत असलेल्या ‘मॉडर्न रिव्यू’ या मासिकात एक लेख प्रकाशित झाला. लेखाचे नाव होते ‘राष्ट्रपती’ आणि लेखकाचे नाव होते चाणक्य.
लेखात असे म्हटले होते की “लोक ज्या प्रकारे नेहरूंना स्वीकारत आहेत त्यामुळे त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी अशी भीती आहे की कदाचित ते हुकूमशहा बनतील. म्हणून नेहरूंना थांबवले पाहिजे. ते महत्त्वाचे आहे.”
लेखाच्या शेवटी असे म्हटले होते की, “वी वान्ट नो सीज़र्स”.
त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर त्यातील सत्य बाहेर आले. चाणक्य या नावाने लेख दुसरे कोणीच नसून स्वतः नेहरूंनीच त्या नावाने लेख लिहला होता. त्याला कारण म्हणजे त्यांना वाटू लागले होते की ज्या प्रकारे भारतीय लोक त्याला पाहू लागली आहे. त्यामुळे ते हुकूमशहा होण्याचा धोका आहे.
अमेरिकन पत्रकार नॉरमन कजिन्स यांनी एकदा नेहरूंना विचारले की तुम्ही कोणता वारसा मागे ठेवून जावू इच्छिता. यावर नेहरूंनी उत्तर दिले होते, “40 कोटी भारतीय ज्यांना स्वतःचे राज्य कसे चालवावे हे माहित आहे.”
महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…
उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…
आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…
अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…
सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…
This website uses cookies.