बाकी बरंच काही !

असा साजरा झाला होता स्वतंत्र भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन

भारताचा पहिला प्रजासत्ताक सोहळा आजच्यापेक्षा खूपच वेगळा होता. भारतात पहिला प्रजासत्ताक दिन १९५० मध्ये साजरा करण्यात आला होता. २६ जानेवारी १९५० ला सकाळी १०.१८ मिनिटांनी भारताचं संविधान लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर काही मिनिटांनी १०.२४ वाजता डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती.

इरविन मैदानात भारतीय ध्वज फडकवला

२६ जानेवारी १९५० ला भारतीय संविधान आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या रूपाने भारताला पहिले राष्ट्रपती लाभले. हा प्रजासत्ताक दिन साजरा करत पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी इरविन मैदानात भारतीय ध्वज फडकवला होता.

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीतील राजपथावर होणारे संचलन हा सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असतो.

१९५५साली हे संचलन सुरू झाले. या दिवशी सेनेद्वारे परेड केली गेली होती आणि तोफांची सलामी देण्यात आली होती. परेडमध्ये सशस्त्र सेनेच्या तिन्ही दलांनी सहभाग घेतला होता. १९५५ मध्ये पहिल्यांदा राजपथाची प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी निश्चिती करण्यात आली.

१९५० आणि १९५४ दरम्यान भारतात प्रजासत्ताक दोन समारोह साजरा करण्यासाठी एक निश्चित स्थळ नव्हतं. सुरूवातीला हा समारोह लाल किल्ला, नॅशनल स्टेडियम, किंग्सवे कॅम्प आणि नंतर रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आला होता. पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे संचलन इर्विन स्टेडियम (आताचा नॅशनल स्टेडियम)वर झाली होती. हे संचलन पाहण्यासाठी सुमारे १५ हजार लोक उपस्थित होते.

एखाद्या महाराजाप्रमाणे घोडागाडीत बसून आले

प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील ध्वजारोहणाची परंपरा आजही कायम आहे. पूर्वीप्रमाणे आजही राष्ट्रपती ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देतात. पहिल्या प्रजासत्ताक दिनी डॉ. राजेंद्र प्रसाद एखाद्या महाराजाप्रमाणे घोडागाडीत बसून आले होते.१९५० पासूनच प्रजासत्ताक दिनाला इतर देशातील पाहुणे बोलवण्यास सुरूवात झाली होती. पहिल्या प्रजसत्ताक दिवसावर इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्रपती सुकर्णो हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते.

सर्वसामान्य जनतेलाही प्रजासत्ताक सोहळ्याचा अनुभव घेता यावा म्हणून तेव्हाचे चित्ररथ दिल्लीतील कॅनॉट प्लेस भागातील रस्त्यांवरून राजपथावर यायचे. पहिल्या प्रजासत्ताक दिनी चित्ररथ काढण्यात आले होते. मात्र, तेव्हाचे चित्ररथ अत्यंत साधे असायचे. हळूहळू त्यांचे स्वरूप बदलत गेले.

तरीही झाली होती चेंगराचेंगरी तेव्हा देशाची लोकसंख्या कमी होती हे खरं असलं. तरी पहिल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याबद्दल लोकांना प्रचंड कुतूहल होते. त्यामुळं १९५५ साली राजपथावर मोठी गर्दी झाली होती. सोहळा पाहण्यासाठी चढाओढ लागली होती. त्यातून काही प्रमाणात चेंगराचेंगरी झाली होती.

Santosh Dalpuse

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

10 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.