मैदानातून

स्वतंत्र भारतातील पहिलं गोल्ड मेडल कस मिळालं ?

यंदाच्या १५ ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशभर “आझादी का अमृत महोत्सव” साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने देशाच्या जडणीघडणीतल्या काही प्रमुख घटनांचा आढावा आम्ही घेत आहोत.

 

15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पहिल्यांदा ध्वज फडकवण्यात आला, तेव्हा येणाऱ्या काळात देशाची एवढी प्रगती होईल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती. ब्रिटीशांपासन भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत. भारताने क्रीडा जगतात अनेक यश मिळवले आहे. देशासमोर आजही क्रीडा क्षेत्रातील अशा अनेक आठवणी आहेत ज्या कधीच विसरता येणार नाहीत.

ही घटना आहे 1948 ची. भारत पहिल्यांदाच स्वतंत्र झाला होता. गुलामीच्या बेड्या गळून पडल्या होत्या. पहिल्यांदाच भारत तिरंगा ध्वजाखाली ऑलिम्पिकच्या मैदानात उतरला होता. हा भारतीय संघ होता हॉकीचा.

हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे. याच हॉकी मध्ये भारताने तीन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. मात्र, त्या वेळी देश स्वतंत्र नव्हता. मात्र 1948 मध्ये भारतीय हॉकी संघाने प्रथमच आपला दबदबा सिद्ध केला.

भारतीय हॉकी टीम ही ऑलिम्पिक स्पर्धांच्या इतिहासातील सगळ्यात यशस्वी टीम आहे.

भारताने आतापर्यंत सर्वाधिक 8 गोल्ड मेडल जिंकली आहेत. 1928 ते 1956 दरम्यान भारतीय हॉकी टीमने एकही मॅच न गमावता सहाच्या सहा ऑलिम्पिक गोल्ड पटकावली. आणि ऑलिम्पिकपर्यंत पोहोचण्यासाठी त्या काळी टीमने कधी कधी चक्क दीड महिना बोटीने प्रवास केलाय.

प्रवासाचा अतिरिक्त खर्च टाटांनी उचलला

लंडन ऑलिम्पिकसाठी संघनिवडीमागेही एक विशेष कहाणी दडलेली आहे. कारण अखंड भारतासाठी खेळणारे नियाज खान, अजीज मलिक, अली शाह दारा आणि शाहरूख मोहम्मदसारखे खेळाडू आता पाकिस्तानच्या संघात सहभागी झाले होते.

मेजर ध्यानचंद यांच्या कार्यकाळात ऑलिम्पिक खेळण्यासाठी संघाला समुद्रमार्गे जहाजाने हा लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागायचा. मात्र, किशन लाल यांच्या नेतृत्वाखालील संघाने स्वातंत्र्यानंतर लंडन ऑलिम्पिकचा प्रवास विमानाने केला. या प्रवासाचा अतिरिक्त खर्च टाटांनी उचलला होता.

4-0 असा धुव्वा उडवत सुवर्णपदकावर मोहोर

१५ ऑगस्ट 1947 रोजी भारत इंग्रजाच्या गुलामीतून मुक्त झाला. विशेष म्हणजे वर्षभरानंतर 12 ऑगस्ट 1948 रोजी ब्रिटिशांच्याच भूमीवर ऑलिम्पिकच्या महायुद्धात भारताने दोन हात केले. गुलामीची जोखडं झुगारून भारत खंबीरपणे उभा राहिलाच नाही, तर दीर्घकाळ सत्ता गाजवणाऱ्या ब्रिटनलाही चारीमुंड्या चीत केले.ब्रिटनचा 4-0 असा धुव्वा उडवत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.

एवढे एकच पदक आले होते

संघात केडी सिंह बाबू, केशव दत्त, लेस्ली क्लाउडियससारखे दिग्गज खेळाडू होते.1948 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताच्या झोळीत एवढेच एक पदक आले होते. इतर क्रीडा प्रकारांत मात्र त्याकाळी भारताचे हात रिकामेच राहिले.त्यानंतरच्या पुढच्या दोन्ही ऑलिम्पिकमध्येही भारताने सुवर्णपदक जिंकले.

स्वतंत्र भारताचं नाव जगभर पसरवण्याची भावना मनात होती आणि त्यातून हॉकीपटूंना बळ मिळत होतं. हॉकीतला सर्वाधिक गोल्ड मिळवण्याचा रेकॉर्ड अजूनही भारताच्या नावावर आहे. भारताने तब्बल आठ ऑलिम्पिक गोल्ड आतापर्यंत मिळवलीत. त्या खालोखाल जर्मनीने चार गोल्ड मिळवलीत.

Santosh Dalpuse

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

10 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.