जेव्हा राजीव गांधींनी अटलबिहारी वाजपेयी यांचे प्राण वाचवले

आज सध्याच्या परिस्थिती मध्ये जेव्हा राजकारणामध्ये आणि राजकारणी लोकांमध्ये कटुता वाढत आहे. पण भारताच्या राजकीय इतिहासामध्ये अश्या अनेक गोष्टी आहेत, ज्या राजकारणातल्या चांगल्या बाजूचे प्रतिनिधित्व करतात.

असाच एक किस्सा आहे तो माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि राजीव गांधी यांच्यातला. पत्रकार करण थापर यांनी आपल्या पुस्तकात हा किस्सा लिहिला आहे.

जेव्हा राजीव गांधींच्या हत्येनंतर करण थापर यांनी वाजपेयीजींना फोन करून राजीव गांधी यांच्या विषयी बोलायला आवडेल का ? असे विचारले असता वाजपेयीजींनी करण यांना घरी बोलावले व करणला सांगितले की दुसरे कोणी सांगण्याआधी त्यांना काहीतरी सांगायचं आहे.

वाजपेयी यांनी त्यावेळी करण थापर यांना सांगितले की, “जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते तेव्हा त्यांना कळले की मला किडनीचा आजार आहे. ज्याचा परदेशात उपचार केला जाईल, तेव्हा राजीव यांनी मला कार्यालयात बोलावले आणि सांगितले की ते यूएन मध्ये जाणाऱ्या भारतीय प्रतिनिधीमंडळात तुम्हाला जायचं आहे आणि आशा व्यक्त करतो की या संधीचा वापर करून मी आवश्यक ते उपचार करेन. मी न्यूयॉर्कला गेलो आणि माझा उपचार केला आणि आज मी तुमच्यासमोर बसलो आहे, आज मी जिवंत आहे.

वाजपेयी पुढे म्हणाले होते, “तर माझी समस्या काय आहे हे आपल्याला समजले असेल. करण, मी आज विरोधात आहे आणि लोकांना मी विरोधकांप्रमाणेच राजीव गांधींबद्दल बोलावे असे वाटते. पण मी ते करू शकत नाही. राजीवने माझ्यासाठी काय केले याविषयी मला फक्त बोलायचे आहे. जर ते तुमच्यासाठी योग्य असेल तर मी बोलण्यास तयार आहे. जर ते तेथे नसेल तर मला काही सांगायचे नाही. “

अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय राजकारणातील सर्वोत्तम नेते मानले गेले. त्याला अशी खूप सारी कारणे आहेत.

आज मात्र आपण सत्ताधारी आणि विरोधी दोन्हीकडून या वर्तनाची अपेक्षा करणे शक्य नाही. मागच्या काही वर्षात राजकारणातली कटुता वाढत चालली आहे.

एक काळ असा होता की पंतप्रधान नेहरू यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीच्या शिखरावर बसून अटल जी सारख्या नव्या मुलाला संसदेत प्रत्युत्तर देत असत आणि नंतर पाठ थोपटून प्रोत्साहित करीत असत. त्यावेळी वाजपेयी पाठीमागे बसायचे पण वाजपेयींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांकडे नेहरू अतिशय काळजीपूर्वक ऐकत असत. आताच्याप्रमाणे विरोधकांची खिल्ली उडवणे ही कदाचित प्रथा नव्हती.

Team Nation Mic

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

10 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.