१५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळवण्यात अनेकांचे मोठे योगदान होते पण महात्मा गांधी यांची महत्त्वाची भूमिका होती. पण जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा दिल्लीत सत्तातराच्या या उत्सवाला महात्मा गांधी उपस्थित नव्हते.
महात्मा गांधी त्यावेळी दिल्लीपासून हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या बंगालमधील नौखाली येथे होते. तेथे हिंदू आणि मुस्लिमांमधील जातीय हिंसाचार थांबवण्यासाठी ते उपोषण करत होते.
१) १४ ऑगस्टच्या मध्यरात्री जवाहरलाल नेहरूंनी ‘ट्रिस्ट विद डेस्टनी’ हे ऐतिहासिक भाषण दिले. आकाशवाणी वरून हे भाषण संपूर्ण जगाने ऐकले, पण त्या दिवशी लवकर झोपायला गेल्यामुळे महात्मा गांधींनी ते ऐकले नाही.
२) दरवर्षी स्वातंत्र्यदिनी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ध्वज फडकवतात, पण १५ ऑगस्ट १९४७ रोजी तसे घडले नाही.
३)लोकसभा सचिवालयाच्या एका रिसर्च पेपरनुसार, नेहरूंनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्यावरून ध्वज फडकवला.
४) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषा १५ ऑगस्टपर्यंत निश्चित करण्यात आली नव्हती. भारत आणि पाकिस्तानच्या सीमा निश्चित करणाऱ्या रेडक्लिफ लाईनची घोषणा करून १७ ऑगस्ट रोजी हा निर्णय घेण्यात आला.
५) १५ ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी त्यात राष्ट्रगीत नव्हते. रवींद्रनाथ टागोरांनी १९११ मध्ये ‘जन गण मन’ लिहिले असले तरी १९५० साली राष्ट्रगीताची स्थापना झाली.
६) दक्षिण कोरिया, बहरीन आणि काँगो मध्येही १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन आहे. पण हे देश अनुक्रमे १९४५, १९७१ आणि १९६० अशा वेगवेगळ्या वर्षांत मुक्त झाले.
७) लॉर्ड माउंटबॅटन यांनीच स्वत: भारताच्या स्वातंत्र्यासाठी १५ ऑगस्टची मुदत निश्चित केली कारण त्यांनी हा दिवस आपल्या कार्यकाळासाठी अतिशय शुभ मानला.
८) १५ ऑगस्ट रोजी भारत वगळता इतर तीन देशांमध्येही स्वातंत्र्यदिन आहे. १५ ऑगस्ट १९४५ रोजी दक्षिण कोरियाची जपानमधून सुटका झाली. ब्रिटनमधून बहरीन ची सुटका १५ ऑगस्ट १९७१ साली झाली . आणि १५ ऑगस्ट १९६० रोजी फ्रान्सपासून काँगो मुक्त करण्यात आला .
९) १५ ऑगस्ट १९४७ रोजी लॉर्ड माउंटबॅटन आपल्या कार्यालयात काम करत होते. दुपारी नेहरूंनी आपल्या मंत्रिमंडळाची यादी दिली आणि नंतर इंडिया गेटजवळील प्रिसेंज गार्डनमध्ये एका सभेला संबोधित केले.
१०) १५ ऑगस्ट १९४७ रोजी १ रुपया १ डॉलर इतका होता आणि सोने प्रति १० ग्रॅम ८८ रुपये ६२ पैसे होते.
महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…
उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…
आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…
अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…
सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…
This website uses cookies.