भारतात रंगीत टीव्ही साठी संघर्ष करणारे वसंत साठे

महाराष्ट्रातून प्रत्येक पाच वर्षाला खासदार दिल्लीत निवडून जातात. आपल्या कार्य कर्तुत्वाने अनेक खासदारांनी दिल्लीत आपली प्रतिमा निर्माण केली. “दिल्लीतला महाराष्ट्र” अशा बाबतीत विचार करताना राज्यातून दिल्लीत निवडून गेलेल्या अश्याच काही खासदारांचे किस्से

भारतात रंगीत टीव्ही साठी संघर्ष करणारे वसंत साठे

वसंत साठे नभोवाणी मंत्री होते आणि त्यांच्याच प्रयत्नामुळे रंगीत टिव्ही सुरु झाले असं म्हणता येईल. किस्सा असा होता कि तेव्हा ब्लॅक व्हाईट टीव्ही होते. भारतात एशियाड स्पर्धा होणार होत्या. त्याचे प्रक्षेपण रंगीत करायचं असा वसंत साठे यांनी ठरवले. तसा प्रस्ताव देखील त्यांनी मंत्रीमंडळ बैठकीत मांडला. पण त्यावेळी उपलब्ध असलेल्या दूरदर्शनच्या मनोऱ्यावरून रंगीत प्रक्षेपण करताच येणार नाही, अस सांगण्यात आले.

पण वसंत साठे आग्रही होते. त्यांनी प्रयत्न सुरु केले. त्यावेळी फक्त दूरदर्शन हेच एकमेव चॅनल होते आणि तेही २४ तास चालणारे नव्हते. ते रात्री ११ वाजता बंद व्हायचे. वसंत साठे यांनी रात्री ११ नंतर रंगीत प्रक्षेपण करून बघायचे ठरवले. रात्री ११ नंतर रंगीत प्रक्षेपण करण्यात आले.

शेवटी साठे यांच्या प्रयत्नाला यश आले. खरंतर दूरदर्शनच्या रंगीत मनोऱ्यावरून प्रक्षेपण शक्य आहे. हे दाखवण्यासाठी वसंत साठे यांनी बरेच प्रयत्न केले होते. पंतप्रधान इंदिरा गांधी आणि खासदारांना रंगीत प्रक्षेपण शक्य आहे हे दाखवण्यासाठी संसद भवनाच्या सेन्ट्रल हॉल मध्ये दोन रंगीत टीव्ही बसवण्यात आले आणि इंदिरा गांधी यांच्या एका कार्यक्रमाचे रंगीत प्रक्षेपण करण्यात आले.

त्यासोबत देशभर रंगीत टीव्हीच्या अॅन्टेनासाठी देखील साठे यांनी मोठा संघर्ष केला. दळणवळण खात्याच्या खांबावर देशभर अॅन्टेना बसवण्यात आले आणि देशभरात रंगीत कार्यक्रम दिसू लागले. तसं पाहता गेल तर त्याकाळी रंगीत प्रक्षेपण हि ऐतिहासिक कामगिरी होती, एवढ नक्की. त्याच सार श्रेयही वसंत साठे यांनाच जात.

वसंत साठे १९७१ आणि १९७७ साली अकोला मतदारसंघातून निवडून आले होते. तर १९८०, १९८४ आणि १९८९ साली वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. केंद्रीय मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पहिले.

Pravin Kale

प्रविण काळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील असून सध्या दिल्ली येथे राहतात. त्यांनी पुणे विद्यापीठातून मी वाणिज्य शाखेची पदवी घेतली असून त्यांनतर दिल्ली येथून भारतीय जन संचार संस्थान दिल्ली (IIMC) येथून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

10 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.