इंदिरा गांधींचा अस्थिकलश पळवणारे वसंत साठे

महाराष्ट्रातून प्रत्येक पाच वर्षाला खासदार दिल्लीत निवडून जातात. आपल्या कार्य कर्तुत्वाने अनेक खासदारांनी दिल्लीत आपली प्रतिमा निर्माण केली. “दिल्लीतला महाराष्ट्र” अशा बाबतीत विचार करताना राज्यातून दिल्लीत निवडून गेलेल्या अश्याच काही खासदारांचे किस्से

इंदिरा गांधींचा अस्थिकलश पळवणारे वसंत साठे

इंदिरा गांधी यांचा खून झाल्यानंतर त्यांचे अस्थिकलश देशभरात पाठवले जाणार होते. साधारणपणे प्रत्येक राज्याचे कलश राज्याचे मुख्यमंत्री किंवा राज्यपाल यांच्याकडे सुपूर्त केले जाणार होते . तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील. पण इंदिराजीच्या निधनामुळे मुंबई मध्ये परिस्थिती बिघडू नये, म्हणून मुख्यमंत्री वसंतदादा रात्रीच मुंबईमध्ये परत आले आणि अस्थिकलश आणण्याची जबाबदारी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर सोपवली.

दुसऱ्या दिवशी सर्व राज्याचे अस्थिकलश रवाना झाले. सोबत महाराष्ट्राचा अस्थिकलश देखील रवाना झाला. पण तो स्वीकारला सुशीलकुमार शिंदे यांनी नाही, तर तो स्वीकारला वसंत साठे यांनी. प्रसंग असा होता झाला कि दिल्लीत तीनमुर्ती भवनात एका झाडाखाली सगळे अस्थिकलश ठेवले होते. प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री किंवा राज्यपाल ते स्वीकारत होते. तिथे वसंत साठे पोहचले आणि आपली पाळी येताच महाराष्ट्राचा कलश द्या, असे म्हणाले. आणि कलश घेऊन ते थेट विमानतळाकडे निघाले.

तेवढ्यात तिथे सुशीलकुमार शिंदे पोहचले. वसंत साठे कलश घेऊन गेल्याचे कळताच त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांचा पाठलाग करून विमानतळावर वसंत साठे यांना गाठले. परिस्थिती वाद घालण्यासारखी नव्हती आणि त्यातही वसंत साठे सुशीलकुमार शिंदे यांना सिनिअर होते. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांनी वसंत साठे यांना विंनती केली कि “अहो, मी कलश घेऊन येणार असं मुंबई मध्ये सगळ्यांना सांगितलं आहे. त्यामुळे निदान मुंबईमध्ये उतरताना तरी मला कलशाला हात लावू द्या. दोघे मिळून खाली उतरू.” आणि वसंत साठे यांनी त्याला संमती दिली.

त्यावेळी इंदिरा गांधी यांचा अस्थिकलश हा भावनिक मुद्दा होता. त्यामुळे याचा फायदा येत्या निवडणुकीत अशी अपेक्षा ठेवून वसंत साठे यांनी हा प्रकार केल्याचेही बोलले गेले. नंतर या कलश अपहरणाच्या बातम्याही वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्या. वसंत साठे १९७१ आणि १९७७ साली अकोला मतदारसंघातून निवडून आले होते. तर १९८०, १९८४ आणि १९८९ साली वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. केंद्रीय मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पहिले.

Pravin Kale

प्रविण काळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील असून सध्या दिल्ली येथे राहतात. त्यांनी पुणे विद्यापीठातून मी वाणिज्य शाखेची पदवी घेतली असून त्यांनतर दिल्ली येथून भारतीय जन संचार संस्थान दिल्ली (IIMC) येथून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

10 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.