व्यक्तिवेध

आणि त्या दिवशी आर आर आबांनी डान्सबार बंदीचा निर्णय घेतला!

आर.आर पाटील १९९० मध्ये प्रथमच विधानसभेवर निवडून गेले आणि १९९९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री म्हणून नियुक्ती केली. तेलगी घोटाळ्यात सहभाग असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राजीनामा दिल्यानंतर २००३ मध्ये त्यांना महत्त्वाच्या गृहखात्याचे वाटप करण्यात आले. २००४ मध्ये त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले.

आर. आर. आबा पाटील यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणूनही पदभार स्वीकारला होता आणि प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यातील तिरंगा फडकवण्यासाठी ते नेहमी तिथे उपस्थित राहायचे.

२६/११ च्या हल्ल्यानंतर ‘मोठ्या शहरांमध्ये छोट्या छोट्या घटना घडतात’ या विधानानंतर त्यांना गृहमंत्रीम्हणून पायउतार व्हावं लागलं.राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने सत्ता राखल्यानंतर २००९ मध्ये पाटील यांची दुसऱ्यांदा गृहमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागात डान्स बारवर बंदी घालण्याच्या वादग्रस्त निर्णयामागेही ते होते.

यामुळे होते आबा अस्वस्थ

शेतकरी कामगार पक्षाचे नेते विवेक पाटील यांच्यासह दोन आमदारांनी पनवेलमधील डान्सबारमुळे तरुण पिढी कशी वाहवत चालली आहे, याकडे लक्ष वेधले होते. त्यातच आर. आर. आबा यांनाही त्यांच्या गावाकडून काही कथा कानावर आल्या होत्या.

त्यांच्या तासगाव मतदारसंघातील काही तरुणांना बसमध्ये घालून पॅकेज देऊन पनवेल, रायगडच्या डान्सबापर्यंत आणले जात होते. त्यांच्याकडील पैसे संपले की, त्यांना वाऱ्यावर सोडले जात होते.

या पॅकेजमुळे गावाकडची पिढी बरबाद होत असल्यामुळे आबा अस्वस्थ होते.आर. आर. पाटील यांनी पहिल्यांदा ३० मार्च २००५ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात डान्सबार बंदीबाबत सूतोवाच केले. मुंबईवगळता राज्यात डान्सबार बंदी करण्याचा त्यांचा मनसुबा होता.

पंचतारांकित हॉटेलातील डान्सबारवर बंदी

मुंबईत डान्सबार बंदी होऊ नये, यासाठी जमवाजमव झाल्याची चर्चाही तेव्हा रंगली होती. डान्सबारवाल्यांचे नेतृत्व करणाऱ्या मनजितसिंग सेठी यांनी आरोप करून खळबळ माजवून दिली होती. परंतु मुंबईतही डान्सबार बंदी झाली आणि मग साडेतीनशेहून अधिक डान्सबार मालक हवालदिल झाले.

उच्च न्यायालयाने वर्षभरातच बंदी उठविल्यामुळे बारमालक खूश झाले होते. उच्च न्यायालयाने डान्सबार आणि पंचतारांकित हॉटेलातील डान्स असा भेदभाव कसा केला जाऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर पंचतारांकित हॉटेलांतील डान्सबारवर बंदीची प्रक्रिया आबांनी सुरू केली. इतकेच नव्हे तर उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध आबांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

राज्यपालांनी अध्यादेश जाहीर करण्यास दिला नकार

गृहमंत्री असताना पाटील यांनी मुंबईच्या डान्स बारवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. किंबहुना तत्कालीन राज्यपालांनी त्यासाठी अध्यादेश जाहीर करण्यास नकार दिला होता.

राज्यपालांचा युक्तिवाद असा होता की हा एक महत्त्वाचा प्रस्ताव असल्याने त्यावर राज्य विधिमंडळात चर्चा व्हायला हवी. अखेर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी अध्यादेश काढला; नंतर हा कायदा बाजूला ठेवण्यात आला.

Team Nation Mic

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

10 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.