मेडिकल प्रॅक्टीस करणाऱ्या रखमाबाई देशातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या

सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, आंनदीबाई जोशी, राजमाता जिजाऊ, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, आज आपण या समाजसुधारकांच्या काळातील अश्या एका व्यक्तीबद्दल आपण जाणून घ्यायला पाहिजे. जी कधी प्रकाशझोतात आली नाही. ती व्यक्ती म्हणजे डॉ. रखमाबाई राऊत !

आता या रखमाबाई कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, 1 जुलै 2018 ला डुडलच्या माध्यमातून रखमाबाई प्रकाशझोतात आल्या.

1864 साली रखमाबाई त्यांचा जन्म मुंबई इथे झाला. वयाच्या 11व्या वर्षीचं त्यांचं लग्न त्यांच्या विधवा आईने लावून दिलं. मात्र, आपल्या पतीकडे जाण्यासाठी रखमाबाईंनी साफ नकार दिला आणि इथूनच सुरू झाला त्यांचा समाज सुधारणेचा बंड .!

काळ हळूहळू पुढे सरकला, आता रखमाबाईंच्या विधवा आईंनी लग्न सावत्र वडिलांचा रखमाबाईंवर खूप प्रभाव होता.

“त्यांचे सावत्र वडील सखाराम अर्जुन हे शल्यविषारद होते. त्यामुळेच त्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली असावी.”

“तसं पाहिलं तर आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या. पण त्यांचं अल्प काळात निधन झालं. म्हणून रखमाबाई या मेडिकल प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या. आनंदीबाईंच्या मृत्यूनंतर लंडन स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये त्या अभ्यास करण्यासाठी गेल्या.”

बालविवाहाविरुद्ध लढा

रखमाबाईंचे पती दादाजी भिकाजी यांनी रखमाबाईंनी नांदायला यावं म्हणून कोर्टात केस दाखल केली होती. आपल्या बालपणी झालेलं लग्न रखमाबाईंना मान्य नव्हते आणि त्याविरुद्ध त्यांनी कोर्टात लढाही दिला.

जस्टिस रॉबर्ट हिल पिंगहे या न्यायाधीशांनी रखमाबाईंच्या बाजूनं निकाल दिला. हा खटला 1884 ते 1887 पर्यंत चालला. यावेळी, समाजकंटकांकडून रखमाबाईवर अनेक टीका टिपणी पण करण्यात आल्या मात्र, रमाबाईंनी यावर कधीच लक्ष केंद्रित केले नाही.

पुढे चालून हेच बालविवाह विरोध एक महत्त्वाचं पाऊल ठरले.

पुढे, एमडीचे शिक्षण घेतांना ही “इंग्लंडच्या कॉलेजनं त्यांना एमडी करण्याची परवानगी दिली नाही. कारण त्याकाळी इंग्लंडमध्येही स्त्रियांना एमडी करण्याची परवानगी नव्हती. त्याकरिता त्यांनी तिथंही लढा दिला. शेवटी त्यांनी ब्रसेल्सला जाऊन पोस्ट ग्रॅज्युअशन पूर्ण केलं व एमडी करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर झाल्या.”

आपली वाचन – लिखाणाची आवड जोपासत रखमाबाईंनी ‘द हिंदू लेडी’ या टोपणनावानं टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेखही लिहीले होते. पण, रखमाबाईंनी याबाबत कधीही जाहीर वाच्यता केली नाही. मात्र, अवघड परिस्थितीत ही मात करून आपलं अस्तित्व निर्माण करणाऱ्या रखमाबाई काही औरच व्यक्तिमत्त्व आहेत.

  • कल्याणी नागोरे
Team Nation Mic

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

10 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.