गोपीनाथ नाव आवडत नव्‍हतं म्‍हणून रडायचे गोपीनाथ मुंडे

महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे हे नाव माहित नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. खरंतर गोपीनाथ मुंडे हे नाव राज्यातील लाखो लोकांच्या हृदयात कोरलेले आहे. पण हेच गोपीनाथ नाव आवडत नाही म्हणून लहानपणी गोपीनाथ मुंडे रडायचे.

गोपीनाथरावांचा हा किस्सा त्यांच्या मातोश्री लिंबाबाई यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितला होता.

 

नाव आवडत नव्‍हतं म्‍हणून रडायचे गोपीनाथराव

एका मुलाखतीमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्‍या मातोश्री लिंबाबाई मुंडे यांनी गोपीनाथरावांच्‍या बालपणाच्या काही खास गोष्‍टींचा खुलासा केला होता, गोपीनाथ मुंडे बालपणी खूप खोडकर आणि हट्टी होते. ‘माझं नाव ‘गोपीनाथ’ का? मला आवडत नाही,’ असे म्‍हणून गोपीनाथराव लहानपणी तासनतास रडायचे. वडिलांनी मात्र त्यांचे खूप लाड केले. अशा अनेक आठवणी लिंबाबाई यांनी सांगितल्‍या होत्‍या.

‘बघा, आय झोपलीय, गाय रस पिऊन गेली.’

एका आठवणीत लिंबाबाई म्‍हणतात, एकदा मी दुपारी स्वयंपाक आटोपून झोपले होते. आमरस करून माठाखाली ठेवला. स्वयंपाकघराच्या बाहेरून कडी घातली. 5-6 वर्षांचा गोपीनाथ आला. मी झोपू नये असे त्याला वाटे. मला झोपलेली पाहून रागावला. गोठ्यातून गाय आणली, कडी उघडली. आमरस गाईला दिला आणि पळत जाऊन ‘दादांना’ आणलं. ‘बघा, आय झोपलीय, गाय रस पिऊन गेली.’ मी घाबरून उठले. म्हणाले, ‘गाय रस पिते आहे, पण लबाडा, गाय कवाड काढून कशी आली रे? आणि माठाखालचा रस हाताने घेतला कारे तिनं?’

अभिनेता राजेश खन्नाचे चाहते होते गोपीनाथराव

गोपीनाथ मुंडे हे सुपरस्टार राजेश खन्नायांचे मोठे चाहते होते आणि पहिल्या दिवशी त्यांनी पाहिलेल्या प्रत्येक सिनेमाचे प्रदर्शन असायचे त्याच दिवशी तो चित्रपट ते बघायचे .

दो हंसो का जोडा

विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्‍यात खास मैत्री होती.विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीत आणि राजकीय वाटचालीत अनेक सारख्या गोष्टी पाहायला मिळतात. दोघांनीही सामान्य कुटुंबातून येऊन राज्य व देशाच्या राजकारणात आपला एक वेगळा ठसा निर्माण केला. दोघेही लोकनेते होते. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांची मैत्री राहिली.

1980 च्या दशकात दोघेही आमदार म्हणून एकाच वेळी विधानसभेवर गेले. दिवंगत देशमुख हे राज्यसभेवर गेले, तर दिवंगत मुंडे हे लोकसभेवर गेले. दिल्लीचे राजकारणही दोघांनी एकदाच सुरू केले. दोघेही ग्रामीण भागातून पुढे आल्याने त्यांना ग्रामीण विकासाची जाण होती. त्यामुळे केंद्रात गेल्यानंतर दिवंगत देशमुख यांना ग्रामीण विकास खात्याचा केंद्रीय मंत्री होता आले. ग्रामीण भागातील सक्षम नेतृत्व असल्याने पक्ष नेतृत्वाने दोघांच्या खांद्यावर ग्रामीण विकास खात्याचीच धुरा दिली हा एक योगायोग होता. या खात्याचाच कारभार करीत असतानाच दोघांचंही निधन झाले.

हा एक विलक्षण योगायोगच म्हणावा लागेल.

Team Nation Mic

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

11 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.