गावगाडा

राजीव गांधीनी राम मंदिराचे कुलूप काढून पूजा केली होती का ?

राजकारण आणि धर्म एकमेकांशी कायम जोडले गेले आहेत, हे भारतीय लोकांना नवीन नाही. मागच्या काही वर्षात देशाच्या राजकारणात एक महत्वाचा मुद्दा राहिलेला प्रश्न म्हणजे अयोध्या मंदिराचा मुद्दा.!

मागच्या काही शतकापासून सुरू असलेला हा मुद्दा गेल्या 28 वर्षांपासुन भाजपाने आपल्या मुख्य अजेंडा ठेवला. आज त्याची पूर्ती होत आहे.

बाबर काळापासून सुरू झाला होता विवाद

1528 मध्ये बाबरने रामजन्मस्थानी मशीद बांधली. तेव्हा पासून या वादाला तोंड फुटले. या घटनेनंतर हिंदूंमध्ये असंतोष निर्माण झाला. 1853 मध्ये या असंतोषाचे रूपांतर जातीय दंगल मध्ये देखील झाले. त्यावेळी भारत इंग्रजांच्या मगरमिठीत होता. ब्रिटिश सरकारने त्या वेळी या जागेला कुंपण घातले. पण काही काळानंतर दोन्ही समुदायांना वेगवेगळ्या भागात पूजा करण्याची परवानगीही दिली गेली. या निर्णयामुळे हे प्रकरण शांत झाले नाही, किंबहुना धुमसतच राहिले.

1885 मध्ये पहिल्यांदा मंदिराची मागणी

सन 1885 मध्ये प्रथम या वादग्रस्त ठिकाणी मंदिर बांधकामाची मागणी करण्यात आली. महंत रघुवर दास यांनी मंदिर बांधण्याचा प्रयत्नही केला होता, पण जेव्हा बांधकामात व्यत्यय आला तेव्हा त्यांनी न्यायालयात धाव घेतली. फैजाबादच्या दरबारात मंदिर बांधण्यासाठी केले गेलेले हे अपील कित्येक वर्ष सुस्त अवस्थेतच राहिले.

दरम्यान च्या काळात 1949 रोजी 50 हिंदूंनी मिळून वादग्रस्त ठिकाणी रामाच्या मूर्तीची स्थापना केली. त्यानंतर लगेचच मुस्लिमांनी तेथील नमाज पठण बंद केले. परिणामी विवादीत जागेला टाळे ठोकले गेले. त्यानंतर 1950 मध्ये पुन्हा एकदा गोपाळ सिंग विशारद यांनी फैजाबादच्या दरबारात भगवान राम यांची उपासना करण्यासाठी विशेष परवानगी मागितली. त्याच वर्षी महंत परमहंस रामचंद्र दास राम उपासनेसाठी स्वातंत्र दावा दाखल केला. लगोलग निर्मोही आखाडा आणि सुन्नी वाफ बोर्ड ही मालकी साठी चाललेल्या या लढाईत उतरले.

मंदिर प्रकरणात राजकिय एंट्री

कोर्टातील दावे आणि प्रतिदावे यांचा निकाल येण्यापूर्वीच हे प्रकरण निवडणूक राजकारणाच्या हाती लागले. विश्व हिंदू परिषदेचे 1984 मध्ये आंदोलन सुरू केले. अशा परिस्थितीतच इंदिरा गांधींच्या हत्येच्या सहानुभूतीच्या लाटेवर मिळालेल्या प्रचंड मातांनी सत्तेवर आरूढ झालेले राजीव गांधी, हे प्रकरण आपल्या विरोधात जाऊ नये म्हणून यात सामील झाले.

1985 मध्ये जेव्हा राजीव गांधीनी या वादग्रस्त जागेचे कुलूप उघडले तेव्हा त्यांना सत्ते वर येऊन एक वर्ष ही झाले नव्हते. 1 फेब्रुवारी 1986 रोजी फैजाबाद जिल्हा न्यायाधीशांनी या वादग्रस्त ठिकाणी हिंदूंना पूजा करणाऱ्याची परवानगी दिली. यावरून संतप्त मुस्लिमांनी बाबरी मशीद अ‍ॅक्शन कमिटीची स्थापना केली.

निवडणुका जवळ येताच राजीव गांधींनी या जागेवरील राम मंदिराची पायाभरणीही केली होती.

परंतु त्यानंतर अचानक हा मुद्दा भाजपाच्या हाती लागला. विश्व हिंदू परिषदेच्या चळवळीला पाठींबा दर्शवून भाजपाने हा संपूर्ण राजकिय मुद्दा बनविला.

Team Nation Mic

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

10 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.