गल्ली ते दिल्ली

अडचणीत आलेल्या मनमोहन सिंग सरकारला विलासरावांनी वाचवले होते

२०११ साल होत.

देशात तेव्हा कॉंग्रेसचे सरकार होते आणि मनमोहन सिंग पंतप्रधान होते. अण्णांनी जनलोकपालच्या मागणीसाठी जंतर मंतर मैदानावर अनिश्चित काळासाठी उपोषण सुरु केलं. बघता बघता अण्णा हजारे यांच्या उपोषणाला लोकांचा पाठींबा वाढू लागला. सरकार अडचणीत येतेय कि काय ? असं वाटत असतानाच विलासराव देशमुख धावून आले.

विलासरावांनी 2011 सालच्या आंदोलनात काय केलं ?

लोकपालच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर उपोषण सुरु केले होते. अण्णाच्या उपोषणानंतर ते सोडविण्यासाठी तत्कालीन केंद्र सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु केले. असं म्हटलं जात कि तेव्हा अण्णांच्या टीममध्ये असलेले अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी प्रत्येक बैठकीत वाद घालत होते, ज्यामुळे बोलणी फिसकटत होती.

एका बैठकीत तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जीं यांनी किरण बेदींना झापलं होतं. त्यामुळे रामलीला मध्ये सुरु असलेलं हे आंदोलन हाताबाहेर जात होतं.

प्रकरणात विलारावांची एन्ट्री

अण्णा हजारे यांनी जेव्हा आंदोलन सुरु केले. तेव्हा विलासराव देशमुख श्रीलंकेत होते. अण्णांची आंदोलनं हाताळण्याचा अनुभव विलासरावांना आहे, असा सल्ला तत्कालिन कृषीमंत्री शरद पवारांनी अर्थमंत्री असलेल्या प्रणव मुखर्जी यांना सल्ला दिला.

टीम अण्णा सोबत मध्यस्थी होत नाही याची जाणीव होताच मनमोहन सिंहांनी विलासरावांना मध्ये घातलं. विलासरावांनी पुन्हा चर्चा सुरु केली पण टीम अण्णा सोबत नाही तर थेट अण्णा सोबत. विलासराव मिडिया, किरण बेदी आणि केजरीवाल अश्या सगळ्यांनाच चुकवून अण्णांना भेटले.

विलासराव अण्णा सोबत चर्चेचं गुऱ्हाळ घालत बसले नाहीत. ते थेट उपोषणस्थळी आले. थेट अण्णानाच तुम्हाला काय हवंय? असं विचारून घेतलं. त्यानंतर ते थेट तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना भेटले.

मनमोहन सिंह यांच्याकडे या मागण्यांबाबत चर्चा केल्यावर ते तत्कालिन विरोधी पक्षनेत्या आणि भाजप नेत्या सुषमा स्वराज यांना आणि इतर विरोधी नेत्यांनाही लुपमध्ये ठेवून आंदोलनातल्या मागण्यांवर सर्व सहमतीने काय करता येईल हे ठरवलं.

त्यानंतर मात्र विलासरावांनी दुसरी भेट थेट केंद्र सरकारची पत्रे घेऊनच घेतली. अण्णांनी या मागण्यांवर सहमत असल्याचं सांगितलं आणि उपोषण अकरा दिवसांनी मागे घेतलं.

अण्णाचे हे उपोषण तब्बल अकरा दिवस चाललं होतं. पण या संपूर्ण अकरा दिवसात विलासराव फक्त दोन वेळा अण्णांना भेटले. पण विलासरावांनी अडचणीत आलेल्या सरकारला अडचणीतून बाहेर काढले.

Team Nation Mic

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

10 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.