भारतीय लोकशाही आणि म्हातारीची गोष्ट

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. ते प्रत्यक्षात आपण अनुभावतोही. पण कधी कधी देशातील लोकशाही धोक्यात आहे. अशी चर्चा घडवून आणली जाते. ते प्रत्यक्षात आहे कि नाही माहित नाही.

पण यावर काॅग्रेसचे दिवगंत जेष्ठ नेते विठ्ठलराव गाडगीळ यांनी एक गोष्ट सांगितली होती. ती लोकशाहीचे स्वरूप सांगते, ती गोष्ट अशी..

“एक म्हातारी होती. ती झोपडीत राहत असे. ती अत्यंत गरीब होती.
तिच्या झोपडीच्या बाहेर एक आंब्याचे झाड होते. त्या झाडाचे आंबे विकून ती आपले पोट भागवत असे; परंतु तिथे शेजारी तिचे आंबे चोरायला लागले. ती आणखी गरीब झाली.

एके दिवशी एक साधू तिच्या झोपडीत आला आणि म्हणाला- म्हातारे मी भुकेला आहे, मला काहीतरी खायला दे. म्हातारी म्हणाली मी गरीब आहे. माझ्याकडे एकच भाकरी आहे; पण त्यातली अर्धी तुला देते. साधूने अर्धी भाकरी खाल्ली, पाणी प्यायला आणि प्रसन्न झाला.

तो साधू तिला म्हणाला. “म्हातारे तू गरीब असशील, परंतु तुला खरी माणुसकी आहे. तू अर्धी भाकर दिलीस – मी प्रसन्न आहे. कोणताही वर माग.

म्हातारी म्हणाली, “मला असा वर दे की माझे शेजारी आंबे चोरायला आले की त्यांनी झाडाला हात लावल्याबरोबर ते झाडाला चिटकून लटकत जातील आणि मी आज्ञा केल्याशिवाय सुटणार नाहीत.”
साधू म्हणाला ‘तथास्तु!’

विठ्ठलराव गाडगीळ

दुसऱ्या दिवशी तिला सकाळी आठ-दहा शेजारी आंब्याला चिकटलेले दिसले. सर्व ओरडत होते, “म्हातारे सोडव!, म्हातारे सोडव!” पुन्हा हात लावणार नाही असे त्यांनी कबूल केल्यावर तिने त्यांना सोडून दिले.

“आणखी काही वर्षे गेली. म्हातारी आणखी म्हातारी झाली. तिच्या मृत्यूची वेळ आली. तिच्या मरणाचा दिवस आला आणि तिला न्यायला यमराज आले. ती यमराजाला म्हणाली, मला आणखी काही वर्षे जगू द्या.

यमराज म्हणाले, “नाही, ते शक्य नाही कारण तुझ्या कपाळावर मरीआईने आजचा दिवस लिहिला आहे. त्यामुळे तुला आजच न्यावे लागेल. परंतु तुझी शेवटची काही इच्छा असेल तर सांग.
म्हातारी म्हणाली, “माझ्या झोपडीच्या बाहेर एक आंब्याचं झाड आहे. मरणापूर्वी त्याचा एक आंबा मला खावासा वाटतो आहे.” आंबा आणायला यमराज स्वतः झाडाजवळ गेले.

झाडाला स्पर्श केल्याबरोबर यमराज झाडाला चिटकले आणि ओरडू लागले,
“म्हातारे सोडव, म्हातारे सोडव”
म्हातारी म्हणाली, “एका अटीवर सोडवीन.

मी इच्छा करेल त्याच वेळी मरेन.
मला इच्छामरणी करशील तर सोडवेन.”
यमराज म्हणाले. “तथास्तु!”

त्यामुळे ती म्हातारी अजून जिवंत आहे आणि ती कधी मरणार नाही.
तिचे नाव आहे “भारतीय लोकशाही !!”

संसदमार्ग : लोकशाहीचा राजमार्ग – लेखक बॅ. विठ्ठलराव गाडगीळ

सध्या देशाच्या एकंदरीत परिस्थितीमध्ये देशाची लोकशाही धोक्यात असल्याच्या आवया उठवल्या जात असताना विठ्ठलराव गाडगीळ यांनी दोन दशकापूर्वी लिहलेली हि छोटी गोष्ट खूप काही सांगून जाते.

Team Nation Mic

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

11 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.