काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतातील मोठ्या लोकसंख्येला बाटलीबंद पाणी एखाद्या वस्तूसारखे विकले जाईल याची कल्पनाही करणं शक्य नव्हतं. भारतातील सुशिक्षित लोकांचा असा समज होता की जगाचा 3 चतुर्थाश भाग पाण्याने व्यापलेला आहे. त्यामुळे पाणी विकत घेऊन प्यावे लागणार नाही. आज भारतात पॅकेज्ड वॉटरचा व्यवसाय 20 हजार कोटी रुपयांहून मोठा आहे आणि बिसलेरी हा यातला सगळ्यात मोठा ब्रँड […]
The post इटालियन फॅलिस बिसलेरी यांची बिसलेरी कंपनी रमेश चौहान यांच्या मालकीची कशी झाली ? appeared first on Nation Mic.
]]>काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतातील मोठ्या लोकसंख्येला बाटलीबंद पाणी एखाद्या वस्तूसारखे विकले जाईल याची कल्पनाही करणं शक्य नव्हतं. भारतातील सुशिक्षित लोकांचा असा समज होता की जगाचा 3 चतुर्थाश भाग पाण्याने व्यापलेला आहे. त्यामुळे पाणी विकत घेऊन प्यावे लागणार नाही.
आज भारतात पॅकेज्ड वॉटरचा व्यवसाय 20 हजार कोटी रुपयांहून मोठा आहे आणि बिसलेरी हा यातला सगळ्यात मोठा ब्रँड आहे.
उन्हाळ्यात बिसलेरीची मागणी इतकी वाढते की मोठ्या शहरांमध्ये खऱ्या बिसलरी ब्रँडची बाटली मिळणे कठीण होते. बिस्लेरीच्या वेबसाईटला भेट दिल्यानंतर असे आढळून आले की पॅकेज्ड वॉटर व्यवसायात बिस्लेरीचा 60% हिस्सा आहे आणि सध्या बिस्लेरीकडे 122 पेक्षा जास्त प्लांट आहेत. पण बिसलेरी कंपनीच्या मालकांनी हा ब्रँड विकायचं ठरवलं आहे.
बिसलेरी कंपनीचे मालक रमेश चौहान म्हणाले की, “बिसलेरी कंपनी विकण्यासाठी अनेक कंपन्यांशी चर्चा सुरू आहे आणि कंपनीची मालकी ते फक्त भारतीय कंपनीलाच देणार आहेत.”
इकॉनॉमिक टाइम्सच्या मते, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (TCPL) देशातील शक्तिशाली ब्रँड बिस्लेरी खरेदी करू शकते. म्हणजेच टाटा समूह आता चहा, कॉफी, मीठ, डाळींसोबत बाटलीबंद पाणी विकण्याची तयारी करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार टाटा समूह ‘बिस्लेरी इंटरनॅशनल’ हि कंपनी 6000-7000 कोटी रुपयांना विकत घेऊ शकतो. बिस्लेरीचे सध्याचे व्यवस्थापन 2 वर्षांसाठी कंपनीचा व्यवसाय सांभाळेल, असेही या करारात निश्चित करण्यात आले आहे.
पण बिसलेरीचे मालक रमेश चौहान सांगतात की “आपण कंपनी विकतोय पण कंपनीची किंमत अजून ठरलेली नाही, टाटा ग्रुपला विकण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की “हे देखील योग्य नाही, फक्त टाटा ग्रुपशीच चर्चा सुरू आहे, असं नाही.”
बिसलेरी कंपनीच्या वेबसाइटनुसार, बिस्लेरीकडे 122 पेक्षा जास्त ऑपरेशनल प्लांट आहेत. भारतात 5,000 ट्रकसह 4,500 पेक्षा जास्त वितरकांचे नेटवर्क आहे. भारतातील पॅकेज्ड वॉटरची बाजारपेठ 20,000 कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. मिनरल वॉटरसह, बिस्लेरी इंटरनॅशनल प्रीमियम हिमालयन स्प्रिंग वॉटर देखील विकते. टाटा ग्रुपने हा करार पूर्ण केल्यास, टाटा ग्रुप एंट्री लेव्हल, मीड सेगमेंट आणि प्रीमियम पॅकेज्ड वॉटर श्रेणीमध्ये सामील होईल.
रमेश चौहान यांनी याआधीदेखील थम्स अप, लिम्का आणि गोल्ड स्पॉट सारख्या प्रसिद्ध लिक्विड ब्रँड विकले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार रमेश चौहान यांची मुलगी जयंती हिला या व्यवसायात रस नाही. ‘बिसलेरी इंटरनॅशनल’च्या प्रवक्त्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “कंपनी विकण्याबाबत चर्चा सुरू आहे, अधिक माहिती आत्ताच देता येणार नाही.”
चौहान यांनी थम्स अप, गोल्ड स्पॉट, माझा आणि लिम्का यांसारखी प्रसिद्ध उत्पादने अमेरिकन कंपनी कोका कोलाला विकली आहेत. हा करार 1993 मध्ये झाला होता. 2016 मध्ये चौहान ‘बिसलेरी पॉप’ नावाच्या कंपनीसोबत शीतपेय व्यवसायात उतरले, पण या कंपनीला फारसे यश मिळू शकले नाही.
बिसलेरी कंपनीची सुरुवात एक औषध कंपनी म्हणून करण्यात आली होती. ही कंपनी मलेरियाच्या औषधांचा पुरवठा करत असे आणि तिचे संस्थापक इटालियन व्यापारी फॅलिस बिसलेरी होते. फॅलिसच्या मृत्यूनंतर बिस्लेरी कंपनीला पुढे नेण्याची जबाबदारी त्याच्या फॅमिली डॉक्टर रसी यांनी घेतली.
डॉ.रसी यांनी त्यांचे वकील खुश्रू सांतकू यांच्यासमवेत भारतात बिस्लेरी लाँच केली. 1965 मध्ये त्यांनी ठाणे, मुंबई येथे पहिला ‘बिसलेरी वॉटर प्लांट’ बांधला. बिसलेरी कंपनीने मिनरल वॉटर आणि सोडा घेऊन भारतात प्रवेश केला.
1969 मध्ये बिसलेरी वॉटर प्लांट सुरू झाल्यानंतर 4 वर्षांनी रमेश चौहान यांनी बिसलेरी कंपनी त्यावेळी ₹ 400000 ला विकत घेतली. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीची मालकी रमेश चौहान यांच्याकडे आहे. रमेश चौहान 82 वर्षांचे आहेत आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांची मुलगी जयंती हिला बिसलेरी कंपनीमध्ये रस नाही, त्यामुळे रमेश चौहान यांना त्यांचा व्यवसाय विकायचा आहे.
बिसलेरी कंपनी सुरुवातीला पंचतारांकित हॉटेल्सपुरती मर्यादित होती. कंपनीला आपले उत्पादन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचे होते. देशातील रेल्वे स्थानके, बसस्थानके, रस्त्यालगत आणि ढाबे, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी पिण्याचे पाणी दर्जेदार नसल्याचे कंपनीच्या लक्षात आले.
चांगल्या दर्जाचे पाणी मिळत नसल्याने लोकांना साधा सोडा विकत घेऊन प्यावा लागत आहे. ही संकल्पना लक्षात घेऊन कंपनीने शुद्ध पाणी देण्यासाठी आपल्या वितरकांची संख्या वाढवली. उत्पादनाची विक्री वाढवण्यासाठी कंपनीने प्रमोशन सुरू केले आणि हळूहळू कंपनी बाजारात वेगाने पसरू लागली आणि आज पाण्याच्या बाटल्यांमधील सर्वात शक्तिशाली ब्रँड बिसलेरी आहे.
The post इटालियन फॅलिस बिसलेरी यांची बिसलेरी कंपनी रमेश चौहान यांच्या मालकीची कशी झाली ? appeared first on Nation Mic.
]]>तुम्ही जर कधी पहिल्यांदा मुंबई ला गेला. त्यावेळी तुम्ही मुंबई मधील “गेट वे ऑफ” नक्की भेट देता. त्यावेळी त्याच गेट वे ऑफ इंडिया समोरील हॉटेल ताज कडे तुम्ही नक्कीच पाहता. हे हॉटेल भारताची एक खास ओळख म्हणुन देखील पाहीले जाते. ताज हॉटेलची चर्चा फक्त आपल्याच देशात नाहीतर विदेशात देखील होते. या हॉटेलची मालकी टाटा उद्योग […]
The post अपमानाचा बदला म्हणून जमशेदजी टाटा यांनी “ताज हॉटेल”ची निर्मिती केली appeared first on Nation Mic.
]]>तुम्ही जर कधी पहिल्यांदा मुंबई ला गेला. त्यावेळी तुम्ही मुंबई मधील “गेट वे ऑफ” नक्की भेट देता. त्यावेळी त्याच गेट वे ऑफ इंडिया समोरील हॉटेल ताज कडे तुम्ही नक्कीच पाहता. हे हॉटेल भारताची एक खास ओळख म्हणुन देखील पाहीले जाते.
ताज हॉटेलची चर्चा फक्त आपल्याच देशात नाहीतर विदेशात देखील होते. या हॉटेलची मालकी टाटा उद्योग समूहाकडे आहे. आजघडीला ताज हॉटेलच्या 99 ब्रांचेस आहेत यातले 83 हॉटेल भारतात आहेत आणि 16 हॉटेल लंडन, अमेरिका, साऊथ आफ्रिका आणि इतर देशांत आहेत.
पण या हॉटेलच्या सुरुवात करण्यामागे एक खुप इंटरेस्टिंग किस्सा देखील सांगितला जातो. असं म्हणतात जमशेदजी टाटा मुंबईच्या वैटसन्स हॉटेल मधे थांबण्यासाठी गेले, पण त्यावेळी त्यांना हॉटेलच्या आतसुद्धा येऊ दिले नाही. याच कारण म्हणजे त्या हॉटेलच्या गेट वर एक बोर्ड होता ज्यावर लिहिलेले होते की,
“कुत्र्यांना आणि भारतीयांना प्रवेश निषिद्ध आहे”
जमशेदजी टाटा यांना ज्यावेळी हि बाब समजली. त्यावेळी त्यांना याचा खूप राग आला आणि जमशेदजी टाटा यांनी बदला म्हणून स्वताचं एक भव्य हॉटेल बांधायचा विचार केला आणि त्याची सुरुवात 16 डिसेंबर 1903 ला केली गेली.
टाटा यांच्याकडून जेव्हा या हॉटेलचे बांधकाम पूर्ण करण्यात आले, तेव्हा त्याच्या सुंदरतेसमोर वैटसन्स सारखे कित्येक विदेशी हॉटेल्स फिके पडले. याच सुविधांना बघुन लोकांनी ताज हॉटेल ला “ग्रँड हॉटेल” असं नाव दिलं. पुढे चालुन ताज हॉटेलमधे भारताचा पहिला लायसेन्स बार बनवण्यात आला आणि देशातला पहीला डिस्को सुद्धा.
त्याकाळी ताज हॉटेल तेव्हा भारताचे एकमेव असे हॉटेल होते जिथे इलेक्ट्रिसिटी, अमेरीकन पंखे, जर्मन सरकत्या पायऱ्या, तुर्किश बाथरुम सारख्या अदभुत सुविधा होत्या.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी जेव्हा मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा दहशतवाद्यांनी ताज हॉटेलवर देखील हल्ला केला होता. त्यावेळी ताज हॉटेलचं नुकसान करायचा प्रयत्न केला. काही प्रमाणात त्याचे काही नुकसान देखील झाले होते, पण त्यानंतर टाटा ग्रुप कडून पुन्हा त्याची दुरुस्ती करण्यात आली.
आतंकवादी हल्ल्यानंतर अमेरिकेचे आजी राष्ट्रपती बाराक ओबामा भारत दौऱ्यावर आले असताना त्यांनी याच ताज हॉटेल मध्ये आपला निवास केला होता.
जमशेदजी टाटा यांनी एका अपमानाचा बदला म्हणून सुरु केलेल्या हॉटेलचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला !
The post अपमानाचा बदला म्हणून जमशेदजी टाटा यांनी “ताज हॉटेल”ची निर्मिती केली appeared first on Nation Mic.
]]>आजघडीला भारतात टाटा सन्सचे साम्राज्य मीठापासून चहापर्यंत, स्टीलपासून कार ट्रकपर्यंत आणि फायनान्सपासून सॉफ्टवेअरपर्यंत सर्वत्र दिसते. जेव्हा एखादा नवीन व्यवस्थापक किंवा कामगार टाटा समूहात काम करू लागतो. तेव्हा त्याला समूहाबद्दल एका वाक्यात सांगितले जाते, “आम्ही प्रत्येक भारतीयाच्या आयुष्याचा एक भाग आहोत.” टाटा समूहाला इतर वैशिष्ट्यांपेक्षा अधिक काही तरी करावे लागते आणि तेच मध्यवर्ती मूल्य आहे. या […]
The post भारतात कामगार कल्याण कार्यक्रम सुरू करणारे जमशेदजी टाटा पहिले उद्योगपती होते appeared first on Nation Mic.
]]>आजघडीला भारतात टाटा सन्सचे साम्राज्य मीठापासून चहापर्यंत, स्टीलपासून कार ट्रकपर्यंत आणि फायनान्सपासून सॉफ्टवेअरपर्यंत सर्वत्र दिसते. जेव्हा एखादा नवीन व्यवस्थापक किंवा कामगार टाटा समूहात काम करू लागतो. तेव्हा त्याला समूहाबद्दल एका वाक्यात सांगितले जाते,
“आम्ही प्रत्येक भारतीयाच्या आयुष्याचा एक भाग आहोत.”
टाटा समूहाला इतर वैशिष्ट्यांपेक्षा अधिक काही तरी करावे लागते आणि तेच मध्यवर्ती मूल्य आहे. या व्यवसाय साम्राज्याचा पाया हा नफ्याशिवाय समाजाचा चराचरा असेल असे या संकल्पनेत म्हटले आहे. या केंद्रीय मूल्याचे संस्थापक होते जमशेदजी नुसरवांजी टाटा.
एल्फिन्स्टन कॉलेजमधून ‘ग्रीन स्कॉलर’ (पदवीधर) झाल्यानंतर जमशेदजीच्या वडिलांनी त्यांना हाँगकाँगला पाठवलं. तिथेच त्याच्या व्यावसायिक आयुष्याची सुरुवात झाली. हे वर्ष होते, जेव्हा डिसेंबरमध्ये त्यांनी जमसेटजी आणि आर्देशिर नावाची हाँगकाँगमध्ये फर्म स्थापन केली. या माध्यमातून चीनला कापूस आणि मॉर्फिन ची निर्यात केली जायची.
याच काळात जगभरात कापसाची मागणी वाढत होती आणि व्यापारी एका रात्रीत अधिक श्रीमंत होत होते किंवा कापसाच्या अंदाजाचा अपव्यय करत होते. प्रत्येकजण या क्षेत्रात नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत होता. लंडन एक मोठी बाजारपेठ होती. जमशेदजींना त्यांच्या वडिलांनी आपले नशीब आजमावण्यासाठी इंग्लंडला पाठवले. सुरुवातीला त्यांनी काही वर्षे कापसाच्या ब्रोकरेजमध्ये घालवली आणि नंतर ज्युट मिलचे ते मालक बनले.
ज्या कामास ‘प्रोफेशनल कल्चर’ म्हणतात, त्या वेळी ती मुळीच नव्हती. कारखान्यांमध्ये कामगारांची उपस्थिती १० ते २० टक्के होती. या समस्येवर मात करण्यासाठी जमशेदजींनी प्रॉव्हिडंट फंड, अपघात विमा योजना आणि पेन्शन फंड स्थापन केले होते. पहिल्यांदाच, मिलमध्ये हवेचा आणि आर्द्रता टाळण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.
इंग्लंडमध्ये कारखाने कायदा लागू होण्यापूर्वी भारतात या सुधारणा लागू करण्यात आल्या होत्या.
कामगारांना पहिल्यांदाच चांगल्या कामासाठी बक्षीस देण्यात आले. त्यात सोने-चांदीची घड्याळे आणि पदके ही देखील होती. ते कपडे वाटून घ्यायला लागले. मजुरांसाठी शौचालय आणि दवाखाना उपलब्ध करून देण्यात आला. व्यवस्थापकांना प्रशिक्षणासाठी निधी देण्यात आला. जमशेदजींचा हा आपल्या कामगारांसाठी घरे बांधण्याचा पहिलाच उपक्रम होता.
कावजी नानाभाई दावर यांनी तारदेव (मुंबई) येथे भारताचा पहिला कापसाचा कारखाना स्थापन केला होता. मुंबई किंवा अहमदाबादच्या आसपास गिरण्या उभारण्यासाठी सगळे जण झगडत होते. जमशेटजी आणि त्यांचे वडील नुसरवाँजी टाटा यांनी पहिल्यांदाच दुसरीकडे गिरणी उभारण्याची मानसिकता तयार केली.

जबलपूर ची जागा निवडण्यात आली. तेथे कापसाची शेती आणि नर्मदा पाणी होते. हा अर्ज सरकारकडे पाठवण्यात आला, पण एक समस्या होती. तिथे एक साधू होता, ज्याच्याकडे अनेक भक्त होते. साधू ला विस्थापित झाल्यास दंगली उसळतील अशी धमकी भक्तांनी दिली तेव्हा ही समस्या निर्माण झाली. हे भांडण टाळण्यासाठी अखेर नागपूरची निवड करण्यात आली.

जमशेदजी टाटा यांच्या मृत्यूनंतर १९०९ मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना झाली. पण या स्वप्नाची सुरवात चक्क १८९६ सालीच झाली . तेव्हा त्यांना जाणवले की भारतात उच्च स्तरीय विद्यापीठे नाहीत किंवा संशोधनही नाही. त्यासाठी ३० लाख मालमत्ता दान करण्याविषयीही जमशेदजींनी चर्चा केली होती.
या कल्पनेबद्दल ते इतके उत्सुक होते की त्यांनी स्वामी विवेकानंदांना पत्र लिहून प्रयत्न करण्याचे आवाहन केले. दुर्दैवाने १९०२ मध्ये विवेकानंद यांचा मृत्यु झाला. स्वामीजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या शिष्या भगिनी निवेदिता जमशेदजींच्या प्रयत्नांच्या समर्थक बनल्या.

जमशेदजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या स्थापनेसंदर्भात ते त्या वेळचे व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन कडे याच्या गेले होते. तेव्हा त्यांनी विचारले, “पण सुशिक्षित हिंदुस्थानी विद्यार्थी कुठे आहेत जे एखाद्या संस्थेची जबाबदारी घेऊ शकतात आणि घेतले तर त्यांच्यासाठी मोठी नोकरी कुठे आहे?” पण यामुळे नाराज न होता. त्यांनी त्यासाठी प्रयत्न चालू ठेवले.
म्हैसूरच्या राजाने या कामासाठी ३७५ एकर जमीन आणि ५ लाख रुपये खर्च केले होते. तसेच संस्थेला दर महिन्याला ५० हजार रुपये देण्याची तरतूद करण्यात आली होती. १९०५ साली, लॉर्ड डेटन यांनी हिंदुस्थान सोडण्यापूर्वी संस्थेच्या स्थापनेला हिरवा कंदील दिला आणि १९०९ मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स स्थापना झाली.
आज जमशेदजी यांच्यानंतर टाटा सन्स भारतात चांगल्या प्रकारे काम करत आहे. पण देशाच्या प्रगती मध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.
The post भारतात कामगार कल्याण कार्यक्रम सुरू करणारे जमशेदजी टाटा पहिले उद्योगपती होते appeared first on Nation Mic.
]]>