विठ्ठलाच्या मंदिरात दलितांना प्रवेशासाठी साने गुरुजींनी पंढरपुरात उपोषण केले होते

पंढरपूरचा विठ्ठल हा अनेकांचा गोरगरिबांचा देव मानला जातो, पण या विठ्ठलाच्या मंदिरात दलितांना प्रवेश नव्हता. यासाठी साने गुरुजींनी पंढरपुरात सलग दहा दिवस उपोषण केले होते.

पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी. साने गुरुजींना आपण एक लेखक म्हणून ओळखतोच. त्यांनी लिहलेले ‘श्यामची आई’ पुस्तक वाचल नसेल असा माणूस शोधून सापडणे दुर्मिळच. त्यांची हळवा मातृभक्त हि प्रतिमा महाराष्ट्राने आजवर जपली आहे.

साने गुरुजींच्या लेखक, विचारवंत, कवी, स्वातंत्र्यसैनिक या प्रतिमेसोबत त्यांच्या सामाजिक क्रांतीच्या कार्याची आठवण देखील ठेवायला पाहिजे.

स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील अनेक मंदिरात दलितांना मंदिरप्रवेश नव्हता. त्यात पंढरपुरच्या विठ्ठल-रुख्मिणीच्या मंदिराचा देखील समावेश होता.

विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात दलितांना प्रवेश मिळण्यासाठी साने गुरुजींनी राज्यभर जनजागृती केली आणि त्यानंतर पंढरपुरात उपोषण करण्याचा निर्णय घेतला. पंढरपुरात आज स्टेशन रोडवर असलेल्या संत तनपुरे महाराज मठात हे उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

साने गुरूजींनी विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात दलितांना प्रवेशासाठी दि. १ ते १० मे १९४६ साली सलग १० दिवस उपोषण केले.

गुरुजींच्या या उपोषणाला सनातनी मंडळींकडून याला विरोध झाला होता. पण जनतेमधून मात्र चांगला पाठिंबा मिळाला. उपोषणाच्या सहाव्या दिवशी जेष्ठ साहित्यिक, राजकारणी असलेल्या प्र.के. अत्रे यांनी उपोषणस्थळी गुरुजींची भेट घेतली होती. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या तुफान सेनेने उपोषणाला पाठिंबा देत साने गुरूजींचे काही कमीजास्त झाल्यास त्याला सरकार जबाबदार असे सांगत सर्व बाजूंनी दबाव वाढविला होता.

लोकसभेचे तत्कालीन सभापती ग. मा. मावळणकर यांनी पंढरपुरात येऊन यामध्ये यशस्वी मध्यस्थी केली. त्यानंतरच्या काळात सर्व जातींतील मंडळींना मंदिरातील प्रवेश खुला झाला.

मावळणकर यांच्या मध्यस्तीनंतर मंदिरात असणारे उत्पात तसेच बडवे यांनी सर्व समाजातील लोकांना मंदिर प्रवेशास होकार दिला. विठ्ठल-रूक्मिणी मंदिरातील प्रवेशानंतर गावागावातील जातीय दरी कमी होवून गावातील पाणवठ्यावर मागासवर्गीयांना पाणी भरता येईल, सर्वत्र समानता येईल, अशी साने गुरूजी यांची भावना होती.

सुसंस्कारित पिढी घडावी यासाठी श्यामची आई यासारखं आदर्श लेखन त्यांनी केले. आईचं अंतकरण असणाऱ्या गुरुजींनी समाजात समानता यावी, सर्वधर्मसमभाव निर्माण व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांनी केलेले काम राज्यातील जनतेसाठी आजही प्रेरणादायी ठरत आहे.

Team Nation Mic

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

11 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.