व्यक्तिवेध

‘या’ महान खेळाडू चा सन्मान करण्यासाठी क्रिकेटमधली रणजी ट्रॉफी सुरू करण्यात आली

भारतीय क्रिकेटचे जनक राजा रणजितसिंह यांची आज १४८ वी जयंती आहे. रणजितसिंह यांचा जन्म 10 सप्टेंबर 1872 रोजी गुजरातमधील नवनगर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव सर रणजितसिंगजी विभाजी जडेजा होते. ते नवनगर राज्याचे महाराज होते. त्यांना नवानगर मध्ये , कुमार रणजितसिंहजी, ‘रणजी’ आणि ‘स्मिथ’ अशी प्रसिद्ध नावाने ओळखले जायचे . रणजितसिंग राजपुत्र असण्याव्यतिरिक्त खूप चांगला क्रिकेटपटूही होते . लहानपणापासूनच त्यांची खेळाची आवड खोलवर रुजली होती. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेण्यासाठी अनेक रंजक गोष्टी जाणून घ्या…

ब्रिटिश संघात खेळले उत्कृष्ट क्रिकेट

महाराजा रणजितसिंह हे जामनगर वारशाचे दहावे महाराज आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू होते. ते ब्रिटिश क्रिकेट संघासाठी उत्कृष्ट क्रिकेट खेळले . ते एक उत्कृष्ट क्रिकेटपटू होते , व्यावसायिक कसोटी सामने आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा पहिला भारतीय होते . क्रिकेटमध्ये अनेक नव्या शॉट्सचा शोध लावण्यासाठीही रणजित ओळखले जातत . शाळेच्या दिवसांत त्याची क्रिकेटशी ओळख झाली. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान ते राजकुमार कॉलेज राजकोटचे कॅप्टन होते. त्यानंतर रणजितला पुढील शिक्षणासाठी इंग्लंडमधील प्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठात पाठवण्यात आले.

इंग्लंडमध्ये महाराजा रणजितसिंह यांची क्रिकेटची आवड वाढू लागली आणि ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकले नाहीत. क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा आणि क्रिकेटपटू बनण्यावर आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा विचार त्यांनी केला. ते पहिल्यांदा केंब्रिज विद्यापीठासाठी खेळले . मग ससेक्स क्लबमध्ये सामील झाले . पहिल्या सामन्यात त्यांनी 77 आणि 150 धावांची जबरदस्त इनिंग खेळली. काउंटी क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीच्या आधारावर रणजितसिंगची इंग्लंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड करण्यात आली. १८९६ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले.

या सामन्यात रणजितने नाबाद 62 आणि 154 धावांची खेळी केली. तो जवळजवळ चार वर्षे क्रिकेट खेळले आणि 15 कसोटी सामन्यांमध्ये 44.89 च्या सरासरीने 989 धावा केल्या. त्यात दोन शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश होता. पहिल्या वर्गात ३०७ सामने खेळताना त्याने ७२ शतके आणि १०९ अर्धशतके झळकावली होती. रणजितसिंगने 56.37 च्या सरासरीने 24692 धावा केल्या होत्या. ते त्या काळातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक होता. नेव्हिल कार्डसने त्याला ‘द मिडसमर नाईट्स ड्रीम ऑफ क्रिकेट’ असेही संबोधले. इंग्लंडमध्ये खेळताना त्याला वांशिक भेदभावाचा सामना करावा लागला होता .

नंतर उत्तराधिकारी वादामुळे ते भारतात परतले. 1920 मध्ये वयाच्या 48 व्या वर्षी ते शेवटचा सामना खेळले , ज्यात रणजितने 39 धावा केल्या होत्या. कसोटी क्रिकेटमध्ये दिवसाचे दोन शतक झळकावण्याचा त्यांचा विक्रम आजपर्यंत एकही फलंदाज मोडू शकलेला नाही.1933 मध्ये जामनगरमध्ये त्यांचे निधन झाले.

महाराजा रणजितसिंह यांचे 2 एप्रिल 1933 रोजी जामनगर येथे वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. सुमारे दोन वर्षांनंतर पटियालाच्या महाराजा भूपिंदर सिंग यांनी क्रिकेटमधील योगदान लक्षात घेऊन १९३५ मध्ये त्यांच्या नावाने रणजी ट्रॉफी सुरू केली. रणजितसिंगचा पुतण्या दलीप सिंगही इंग्लंडकडून क्रिकेट खेळला. त्यांच्या नावाने भारतात दलिप ट्रॉफी सुरू करण्यात आली.

Team Nation Mic

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

11 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.