व्यक्तिवेध

निवडणूक हरल्यानंतरही पुष्कर सिंह धामी मुख्यमंत्री का बनले ?

उत्तराखंडमध्येही पुन्हा एकदा भाजपचाच झेंडा फडकला आहे. भाजपने 70 पैकी 47 जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या स्थानावर 19 जागांसह काँग्रेस आहे. उत्तराखंडमध्ये लवकरच भाजप सत्ता स्थापन करेल. उत्तराखंडमध्ये लवकरच भाजप सत्ता स्थापन करेल.

पण मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा  गेली काही दिवस सुरु होती. मुख्यमंत्रिपदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली होती. पण मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याची उत्सुकता होती.

पण ही माळ आता पुष्कर सिंह धामी यांच्या गळ्यात पडणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे.

उत्तराखंडमध्ये सत्ताधारी भाजपने सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत हे राज्य आपल्याकडे राखून इतिहास घडवला. राज्याच्या २१ वर्षांच्या इतिहासात एका पक्षाला सलग दुसऱ्यांदा सत्ता राखता आली नव्हती.

सत्ता राखण्याच्या या ऐतिहासिक राजकीय लढाईत ‘गड आला पण सिंह गेला’ अशी पक्षाची गत झाली आहे.

मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी पराभूत झाल्याने पक्षाला मोठा धक्का सहन करावा लागला होता.

या निवडणुकीत पुष्कर सिंग धामी आणि हरीश रावत यांनी आपापल्या पक्षांचे नेतृत्व केले. मात्र, भाजप बहुमताच्या दिशेने घोडदौड करीत असताना धामी यांचा खातिमा मतदारसंघात पराभव झाला. धामी यांचा पराभव काँग्रेसचे उमेदवार भुवनचंद्र कापरी यांनी सहा हजार ५७९ मतांनी केला होता.

दोन वेळा ते भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष होते

पुष्कर सिंह धामी यांचा जन्म हा पिथोरागढच्या टुंडी गावात १६ सप्टेंबर १९७५ ला झाला. लखनऊ विद्यापीठात त्यांनी व्यावसायिक शिक्षणात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. ९० च्या दशकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये अनेक पदांवर त्यांनी  काम केलं आहे.

दोन वेळा ते भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. २०१२ मध्ये खटीमा मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले. यांनी मानव संसाधन व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंधात मास्टर्स केले आहेत. 1990 ते 1999 पर्यंत त्यांनी ABVP मध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे.

धामी हे महाराष्ट्राचे राज्यपाल आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांचेही निकटवर्तीय आहे.

लखनऊमध्ये ९० च्या दशकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय संमेलनाच्या संयोजनाची जबाबदारी ही त्यांनी संभाळली होती. राजनाथ सिंह त्यांच्या कामाने त्यावेळी प्रभावित झाले होते. तेव्हापासून धामी हे सतत राजनाथ सिंहांच्या संपर्कात राहिले. धामी हे महाराष्ट्राचे राज्यपाल आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांचेही निकटवर्तीय आहेत. कोश्यारी यांचे बोट धरून धामी यांनी राजकारणात प्रवेश केला, असं बोललं जात.

पुष्कर सिंह धामी हे उत्तराखंड राज्याचे सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री होते. दोन वेळा आमदार राहिलेले धामी हे कधीही उत्तराखंड सरकारमध्ये मंत्री नव्हते. परंतु,  ते थेट मुख्यमंत्रीपदी झाले होते.

मुख्यमंत्री पुष्कर धामी कार्यकर्त्यांसह जनसंपर्कासाठी नेपाळ सीमेवरील धरणाच्या वरच्या भागात पोहोचले होते. परंतु तिथे आपचे उमेदवार एसएस कलेर हे देखील आपल्या उमेवारांसोबत जनसंपर्क करत होते. क्लेर यांनी भाजपवर सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप केला. या प्रकरणावरून मुख्यमंत्री धामी आणि कलेर यांच्यात जोरदार संघर्ष  निवडणुकीच्या काळात पेटला होता .

Team Nation Mic

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

10 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.