Warning: Undefined array key 1 in /home/talukanews/nationmic.in/wp-content/plugins/accelerated-mobile-pages/includes/vendor/amp/includes/utils/class-amp-image-dimension-extractor.php on line 244
वारी सांगण्या-ऐकण्यापेक्षा ती अनुभवण्याचा सोहळा आहे - Nation Mic
Categories: गावगाडा

वारी सांगण्या-ऐकण्यापेक्षा ती अनुभवण्याचा सोहळा आहे

वारी म्हटलं कि तुमच्या डोळ्यासमोर काय येत ? पायी चाललेली दिंडी, लहान थोर सगळेच प्रत्येकाला माऊली- माऊली म्हणत. विठ्ठलाचा गजर करत देहू-आळंदी पासून पंढरपुर पर्यतचा प्रवास म्हणजे वारी. हा प्रवास म्हणजे एक उत्साह असतो, आनंद असतो, जल्लोष असतो. पण यावर्षी हे सगळ असणार नाही.

यंदा कोरोनामुळे पायी वारी रद्द करण्यात आली आहे. पण वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा सूरु ठेवण्यासाठी प्रातिनिधिक स्वरुपात म्हणून थेट बसने पालखी पंढरपुरात पोहचवली जाणार आहे. पण वारीच्या या प्रवासाला एक इतिहास आहे, परंपरा आहे. याविषयी आपण जाणून घेवूया !

पंढरपूर म्हटले की डोळ्यासमोर येते तो वारीचा जल्लोष . पंढरपूरच्या वारीचा आल्ल्हाददायी सोहळा सांगण्यापेक्षा आणि ऐकण्यापेक्षा ती अनुभवाची मज्जा न्यारीच आहे.

आषाढ महिन्यातील (जून -जुलै ) शुक्ल पक्षातील अकरावी तिथी हि प्रथमा एकादशी म्हणून ओळखली जाते. तसेच या तिथीला महाएकादशी म्हणून ओळखण्यात येते. दर महिन्याला शुक्ल आणि कृष्ण पक्षात अश्या वर्षाला २४ एकादशी असतात त्यातील आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अनन्य साधारण महत्व असते.

यंदा १ जुलै २०२० बुधवार रोजी आषाढी एकादशी आहे. ३० जुन २०२० रोजी सायंकाळी ६ वाजून ४९ मिनिटांनी एकादशी सुरु होणार असून ०१ जुलै २०२० रोजी सायंकाळी ५ वाजून २९ मिनिटांनी समाप्त होईल.

नवीन लग्न झालेल्या नववधूला आषाढी एकादशीला माहेरी आणण्याची प्रथा आहे. (या दिवशी वैकुंठाचे दार उघडे असतात हि मान्यता आहे ) आषाढी एकादशी या दिवशी सर्व देवतांचे तेज शक्ती एकवटलेले असते असे मानले जाते. साक्षात भगवंताचा वास असलेली पंढरपूर नगरी म्हणजे भक्तांसाठी जणू पृथ्वीवरचे वैकुंठच आहे.

पूर्वीच्या काळात शेतकऱ्यांची पेरणी झाल्यावर मधातला जो रिकामा असायचा त्यात भक्त या दिवसाला पंढरपूरला म्हणजेच विठोबाच्या वारीला जायचे वारीवरून परत शेतातील पिक बहरून यायचे, हि वारी आणि वारकरी संप्रदाय पद्धती १००० वर्षापासून सुरु आहे.

तसेच चैत्र महिन्यात सुरु झालेल्या मराठी नववर्षातील हा पहिला सण म्हणून पण ओळखला जातो. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात या दिवसापासून देव चार महिने निद्रेत जातात ते कार्तिक एकादशीला जागे होतात असे सांगितले जाते.

मृदुमान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकरांने होऊन वरदान दिले होते की, तू कोणाकडूनही मरणार नाहीस शिवाय एका स्त्रीच्या. त्यानंतर या वरामुळे उन्मत झालेले राक्षस देवांनाच त्रास देऊ लागले. तेव्हा इतर देवांसह महादेव पण काही करू शकत नव्हते तेव्हा ते एका गुहेत जाऊन लपले. त्यावेळी या देवांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली, त्या देवीचे नाव एकादशी होते. त्या दिवशी देवालाही उपवास पडला होता म्हणून एकादशीच्या उपवासाची प्रथा पडली. अशी एक पौराणिक कथा सांगितले जाते.

आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी याला चातुर्मास म्हणतात. धार्मिकतेने विचार केला तर या चार महिन्याच्या काळात देवाची निद्रा चालू असते.तसेच हा चार महिन्याचा काळ पावसाळ्याचा असतो या काळात विविध प्रकारचे जीव जंतू ,कीटक उत्पन्न होतात.सूर्याचे प्रखर तेज पृथ्वीपर्यंत रोज पोहचत नाही. आजारपण रोगराई वाढीस लागते.

त्यामुळे चातुर्मासाच्या या काळात उपासना , नामस्मरण , योग करण्यावर भर दिला जातो आणि संकट आलीच तर भक्ताचा विठूराया त्यांना या संकटातून वाचवेल हा त्यांचा दृढ विश्वास होता. तसेच विठूराया आत्ताही आपल्याला कोरोना विषाणूपासून वाचवेल याच आशेवर यंदाही भक्तगण आषाढी एकादशी साजरी करतील आणि परंपरा जपतील.

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा

  • निधी गौरखेडे
Team Nation Mic

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

10 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.