गल्ली ते दिल्ली

शिवाजी पार्कवरच्या जाहीर सभेत बाळासाहेबांनी शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आणि…

शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर पुढच्या काही वर्षात शिवसेना मुंबई महापालिका आणि राज्यभरात विस्तार करू लागली. पण याच काळात १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना करिष्मा दाखवू शकली नाही.

मुंबई महापालिका निवडणुकीत देखील शिवसेना नेते-उमेदवारांचा दारुण पराभव झाला. बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर काही प्रश्न निर्माण होवू लागले.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीतलं आलेलं अपयश आणि मुंबई महापालिकेचा तो पराभव बाळासाहेबांच्या जिव्हारी लागला.

त्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी बाळासाहेबांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. शिवाजी पार्कवरील झालेल्या सभेत मी शिवसेना पक्षप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं.

काय होता तो प्रसंग

बाळासाहेबांचे वडील संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे बिनीचे शिलेदार प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचं 20 नोव्हेंबर 1973 रोजी निधन झाले. आईनंतर दुसरं सत्र बाळासाहेबांच्या डोक्यावरुन हरपलं. शिवसेना उभी करण्यात प्रबोधनकारांचा मोलाचा वाटा होता .

बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे संबंध अगदी मित्रत्वाचे होते. अनेक गोष्टी ते एकमेकांशी शेअर करायचे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या जाण्याने बाळासाहेबांच्या आयुष्यात फार मोठी पोकळी निर्माण झाली. परंतु बाळासाहेब यांच्या पत्नी मीनाताईंच्या सामर्थ्यानं आणि शिवसैनिकांच्या बळावर बाळासाहेब पुन्हा उभा राहिले…!

तो निर्णय का घेतला असावा?

१९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीला बाळासाहेबांनी शिवसेनेच्या वतीने पाठिंबा दिला. खरंतर त्या काळात बाळासाहेबांचा हा निर्णय अनेक सेना नेत्यांना रुचला नव्हता, पचलाही नव्हता. बाळासाहेबांनी असा निर्णय का घेतला असावा असा प्रश्न अनेक शिवसैनिकांना पडला होता.

पण बाळासाहेबांचा आदेश तो आदेश असतो. बाळासाहेबांपुढे कोण काय बोलणार…?

बाळासाहेबांनी मार्मिकच्या अनेक अंकातून मराठी माणसांवरील अन्यायाला तत्कालीन काँग्रेस राजवटीला जबाबदार धरले होते.

मग अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी यांना पाठिंबा का? असा प्रश्न अनेक दिग्गजांना पडला. पण बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना नव्हे तर इंदिरा गांधींच्या योग्य वेळी आणीबाणीचा जाहीर केलेल्या निर्णयाला पाठिंबा दिला होता.

मतभेद असावेत पण मनभेद नसावेत असं म्हटलं जातं. बाळासाहेबांचा विरोध आयुष्यभर सर्वांशी मतभेदाच्या स्वरुपात झाला आणि मनभेद होण्यापूर्वीच बाळासाहेब ते नातं सावरत असत. अनेकांना बाळासाहेब शेवटपर्यंत समजले नाहीत.

अखेर राजीनामा मागे घेतला

सभेत मी शिवसेना पक्षप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचं ते म्हणाले. एकंदरित विधानसभा निवडणुकीतलं आलेलं अपयश आणि मुंबई महापालिकेचा तो पराभव बाळासाहेबांच्या सर्वार्थाने जिव्हारी लागला होता. त्यावेळी शिवाजी पार्कवर एकच हल्लकल्लोळ माजला.

उपस्थित शिवसैनिकांनी ‘नाही नाही…’ असा आवाज केला… त्यावेळेस जरी काही गोष्टींना आधारुन बाळासाहेबांचे विचार शिवसैनिकांना समजले नव्हते, पटले नव्हते. परंतु बाळासाहेबांवर त्यांची प्रचंड निष्ठा होती. त्यामुळे तिथं एकच गदारोळ झाला आणि शिवसैनिकांच्या आग्रहास्तव बाळासाहेबांनी अखेर राजीनामा मागे घेतला.

Team Nation Mic

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

10 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.