एकाच घरातील चार सख्खे भाऊ झाले ‘आमदार’

आपल्या देशातील राजकारणात घराणेशाही काही नवीन नाही. पण चार सख्खे भाऊ आमदार होण्याची घटना देशात पहिल्यांदाच घडली आहे. जारकीहोळी कुटुंबातील तिघे सध्या विधानसभेचे आमदार आहेत. आता लखन जारकीहोळी हे विधानपरीषद सदस्य झाले आहेत.

विधानपरीषद निवडणूकीत विजयामुळे जारकीहोळी बंधूंचे बेळगाव जिल्ह्यातील राजकीय वजन पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.

सख्खे चौघे भाऊ आमदार होण्याचे हे देशातील दुर्मिळ उदाहरण आहे.

मूळचे गोकाक येथील जारकीहोळी बंधूंचा हा राजकीय प्रवास विलक्षण आहे. तोच पाहण्याचा हा प्रयत्न आहे.

जारकीहोळी कुटुंबातील सर्वात मोठे रमेश हे गोकाक विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे. भालचंद्र हे आरभावी मतदारसंघाचे आमदार आहेत. हे दोघेही भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत.

सतीश जारकीहोळी हे यमकनमर्डी मतदारसंघाचे कॉंग्रेस पक्षाचे आमदार आहेत. लखन हे मात्र अपक्ष म्हणून विधानपरीषदेवर निवडून गेले आहेत. सख्खे चौघे भाऊ आमदार होण्याचे हे देशातील दुर्मिळ उदाहरण आहे.

सलग पाचवेळा ते विधानसभेवर

१९९९ साली रमेश जारकीहोळी कॉंग्रेस पक्षाकडून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. २०१९ पर्यंत ते कॉंग्रेस पक्षातच होते व सलग पाचवेळा ते विधानसभेवर निवडून गेले होते. पण २०१९ साली त्यानी कॉंग्रेस पक्षाचा व विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला व भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

भाजपकडून त्यांनी पोटनिवडणूक लढविली व ते विजयी झाले. पोटनिवडणूकीत लखन यानी त्यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती, पण आता विधानपरीषदेच्या निवडणूकीत लखन यांच्या विजयात रमेश यांचाच मोठा वाटा आहे असे म्हटले जाते.

भालचंद्र व सतीश आधी धर्मनिरपेक्ष जनता दलात होते. भालचंद्र हे विधानसभा सदस्य तर सतीश हे विधानपरीषद सदस्य होते. २००६ साली सतीश यानी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

२००८ साली यमकनमर्डी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविली व ते निवडूनही आले. भालचंद्र यानी २००८ साली ऑपरेशन कमळमध्ये जनता दल सोडून भाजप प्रवेश केला. तेंव्हापासून ते भाजपमध्येच आहेत.

राज्यात कॉंग्रेस पक्षाचे सरकार असताना सतीश याना मंत्रीपद मिळाले होते, ते जिल्हा पालकमंत्रीही होते. २००८ साली भाजप सत्तेत असताना भालचंद्र यानाही मंत्रीपद मिळाले होते. रमेश कॉंग्रेसमध्ये असताना व भाजपमध्येही मंत्री झाले होते. पण लखन यांना अपक्ष निवडणूक लढविण्यास सांगून त्याना विधानपरीषदेवर निवडून आणण्यात रमेश यांचाच प्रमुख वाटा आहे.

२०१९ साली लखन यानी गोकाक मतदारसंघातून विधानसभेची पोटनिवडणूक लढविली होती. बंधू रमेश जारकीहोळी यांच्या विरोधातच त्यानी कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी घेतली होती. त्या पोटनिवडणूकीत भाजपचे उमेदवार असलेल्या रमेश यांचा विजय झाला होता.

बंधू राज्यात नेहमीच चर्चेत असतात

त्यानंतर दीड वर्षांनी झालेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत लखन व रमेश एकत्र आले होते. या दोहोनी आपलेच बंधू व कॉंग्रेसचे उमेदवार सतीश यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे सतीश याना पराभव स्विकारावा लागला होता. या अशा परस्पर विरोधी राजकारणामुळेच जारकीहोळी बंधू राज्यात नेहमीच चर्चेत असतात. अशा स्थितीतही जारकीहोळी कुटुंबातील पाच जणांपैकी चौघे आमदार झाले आहेत.

Team Nation Mic

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

10 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.