आपल्या राज्यात सतत चर्चेत असणारी काही नावे काढली तर यामध्ये सर्वात वरती एक नाव येईल ते म्हणजे तुकाराम मुंडे. आपल्या कामाच्या पद्धतीमुळे तुकाराम मुंडे कायम चर्चेत असतात.
नुकतीच त्यांची राज्य सरकारने पुन्हा बदली केली आहे.
महाराष्ट्रात तुकाराम मुंडे प्रसिद्ध होण्याचे मुख्य कारण म्हणजे राजकारणी आणि भ्रष्ट लोकांना ते ज्या प्रकारे वागवतात. त्यामुळे सामान्य जनता मात्र त्यांना हिरो मानते, हे नक्की तुकाराम मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील एका छोट्या गावात झाला. ३ जून १९७५ रोजी जन्मलेले तुकाराम मुंढे यांचं दहावी पर्यंतच शिक्षण सामान्य पद्धतीनेच जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं.
पुढे त्यांनी इतिहास आणि समाजशास्त्रातून बी. ए. ही पदवी मिळवली तर राज्यशास्त्रातून एम. ए. चे शिक्षण पूर्ण केले. त्याच दरम्यान त्यांनी जळगाव येथे अध्यापनाचे कार्य देखील केले.
पदवीनंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेऊन त्यांनी पुढील अभ्यासाला सुरुवात केली. आधी एमपीएससी मार्फत वित्तीय सेवेचे गट ब अधिकारी म्हणून निवड झाली. एमपीएससी परीक्षेत निवड झाल्यानंतर पुणे येथील “यशदा” या संस्थेत अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होत असते तेव्हाच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल लागला. त्यात ते देशातून विसाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंढे यांची पहिली नियुक्ती सोलापूर येथे झाली. याच काळात त्यांची प्रशासकीय अधिकारी म्हणून कसे काम करतील याची झलक सर्वच लोकांना पाहायला मिळाली.
याच काळात सोलापुरात अतिक्रमनाच्या प्रश्नावरून तुकाराम मुंढे यांना मोठा संघर्ष करावा लागला. त्यातच त्यांची बदली झाली. त्यानंतर आजपर्यंत तुकाराम मुंढे आणि बदली हे एक समीकरणच होऊन बसले आहे.
२००८ मध्ये नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना त्यांनी काही जिल्हा परिषदेच्या शाळांचा दौरा केला. त्यात त्यांना शिक्षकच शाळेत गैरहजर आढळले. दुसऱ्या दिवशी त्या सर्व अनुपस्थित शिक्षकांना त्यांनी निलंबित केले होते. तेव्हापासून या प्रकारांना चाप बसला तो कायमचाच !
जिल्हा ग्रामीण रुग्णालयात त्यांना डॉक्टर अनुपस्थित दिसले तर त्यांनी डॉक्टरांना पण निलंबित केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने डॉक्टरला निलंबित करण्याचे हे पहिलेच प्रकरण होते.
तुकाराम मुंढे सोलापूरला जिल्हाधिकारी असताना पंढरपूरातील श्री विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी वारकरी लोकांसाठी त्यांनी फक्त २१ दिवसात तात्पुरत्या शौचालयांची निर्मिती केली.
त्याचसोबत मुख्यमंत्री सोडून इतर व्हीआयपी लोकांची खास दर्शनव्यवस्था बंद केली. यावरून मोठा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला होता. त्यामुळे तुकाराम मुंढे जिकडे जातात तिकडे राजकारणी लोकांना डोकेदुखी ठरतात. हे मात्र नक्की
महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…
उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…
आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…
अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…
सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…
This website uses cookies.